शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरअखेर रबीचा पेरा २७ टक्के

By admin | Updated: December 2, 2015 02:17 IST

खरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

१ लाख हेक्टरवर क्षेत्र : ६,९५४ मध्ये गहू तर २०,१७४ हेक्टरात हरभरा रूपेश खैरी वर्धाखरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रबीबर लागल्या होत्या; पण जमिनीत ओलावा नसल्याने रबीचा पेराही सध्या अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार १०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. हा आकडा प्रत्येक वर्षाचा असून यात सरसरी ५४ हजार ५०० हेक्टरवर पेरा होत असल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पेरा होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत २७ हजार ५१६ हेक्टरवर पेरा झाल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची झाली. जिल्ह्यात २० हजार १७४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ६ हजार ९५४ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. या तुलनेत रबी ज्वारीचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात २५७ हेक्टरवर ज्वारी तर १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा करण्यात आला आहे.जिल्ह्यात ओलिताचा पेरा वाढवा व झालेल्या पेरणीचे ओलित करता यावे यासाठी जलसाठ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ओलित करण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून रबीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रबी हंगामातील पेरणी होण्याचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. यामुळे पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून हा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. रबी ज्वारीचा पेरा २५७ हेक्टरवरजिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात ज्वारीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्यावतीने देण्यात आले होते. यामुळे येत्या काळात सदैव जानवणारी वैरणाची समस्या निकाली निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती; पण जिल्ह्यात केवळ २५७ हेक्टरमध्येच ज्वारीचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्वारीच्या पेऱ्यामध्ये वाढ होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची समस्या निकाली निघावी यासाठी जिल्ह्यात मक्याचा पेरा होत असल्याचे दिसून येते. यात जिल्ह्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यात एकूण १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. ज्वारी आणि मक्याचा पेरा वाढल्यास गुरांच्या चाऱ्याची समस्या संपुष्टात येऊ शकते; पण पक्षी, प्राण्यांच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या पेऱ्यात वाढ होत नसल्याचे वास्तव आहे.