शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

नोव्हेंबरअखेर रबीचा पेरा २७ टक्के

By admin | Updated: December 2, 2015 02:17 IST

खरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

१ लाख हेक्टरवर क्षेत्र : ६,९५४ मध्ये गहू तर २०,१७४ हेक्टरात हरभरा रूपेश खैरी वर्धाखरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रबीबर लागल्या होत्या; पण जमिनीत ओलावा नसल्याने रबीचा पेराही सध्या अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार १०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. हा आकडा प्रत्येक वर्षाचा असून यात सरसरी ५४ हजार ५०० हेक्टरवर पेरा होत असल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पेरा होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत २७ हजार ५१६ हेक्टरवर पेरा झाल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची झाली. जिल्ह्यात २० हजार १७४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ६ हजार ९५४ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. या तुलनेत रबी ज्वारीचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात २५७ हेक्टरवर ज्वारी तर १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा करण्यात आला आहे.जिल्ह्यात ओलिताचा पेरा वाढवा व झालेल्या पेरणीचे ओलित करता यावे यासाठी जलसाठ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ओलित करण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून रबीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रबी हंगामातील पेरणी होण्याचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. यामुळे पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून हा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. रबी ज्वारीचा पेरा २५७ हेक्टरवरजिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात ज्वारीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्यावतीने देण्यात आले होते. यामुळे येत्या काळात सदैव जानवणारी वैरणाची समस्या निकाली निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती; पण जिल्ह्यात केवळ २५७ हेक्टरमध्येच ज्वारीचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्वारीच्या पेऱ्यामध्ये वाढ होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची समस्या निकाली निघावी यासाठी जिल्ह्यात मक्याचा पेरा होत असल्याचे दिसून येते. यात जिल्ह्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यात एकूण १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. ज्वारी आणि मक्याचा पेरा वाढल्यास गुरांच्या चाऱ्याची समस्या संपुष्टात येऊ शकते; पण पक्षी, प्राण्यांच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या पेऱ्यात वाढ होत नसल्याचे वास्तव आहे.