शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

नोव्हेंबरअखेर रबीचा पेरा २७ टक्के

By admin | Updated: December 2, 2015 02:17 IST

खरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

१ लाख हेक्टरवर क्षेत्र : ६,९५४ मध्ये गहू तर २०,१७४ हेक्टरात हरभरा रूपेश खैरी वर्धाखरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन हातचे गेले. शिवाय कपाशीला मिळणारा दरही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रबीबर लागल्या होत्या; पण जमिनीत ओलावा नसल्याने रबीचा पेराही सध्या अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ लाख ३ हजार १०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. हा आकडा प्रत्येक वर्षाचा असून यात सरसरी ५४ हजार ५०० हेक्टरवर पेरा होत असल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पेरा होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत २७ हजार ५१६ हेक्टरवर पेरा झाल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची झाली. जिल्ह्यात २० हजार १७४ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ६ हजार ९५४ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. या तुलनेत रबी ज्वारीचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात २५७ हेक्टरवर ज्वारी तर १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा करण्यात आला आहे.जिल्ह्यात ओलिताचा पेरा वाढवा व झालेल्या पेरणीचे ओलित करता यावे यासाठी जलसाठ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ओलित करण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून रबीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रबी हंगामातील पेरणी होण्याचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. यामुळे पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून हा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. रबी ज्वारीचा पेरा २५७ हेक्टरवरजिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात ज्वारीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्यावतीने देण्यात आले होते. यामुळे येत्या काळात सदैव जानवणारी वैरणाची समस्या निकाली निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती; पण जिल्ह्यात केवळ २५७ हेक्टरमध्येच ज्वारीचा पेरा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्वारीच्या पेऱ्यामध्ये वाढ होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची समस्या निकाली निघावी यासाठी जिल्ह्यात मक्याचा पेरा होत असल्याचे दिसून येते. यात जिल्ह्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यात एकूण १३१ हेक्टरवर मक्याचा पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. ज्वारी आणि मक्याचा पेरा वाढल्यास गुरांच्या चाऱ्याची समस्या संपुष्टात येऊ शकते; पण पक्षी, प्राण्यांच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या पेऱ्यात वाढ होत नसल्याचे वास्तव आहे.