शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

जूनअखेरीस केवळ ४५१ हेक्टरवर पेरा

By admin | Updated: June 28, 2014 00:32 IST

जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा पेरा संपण्याच्या मार्गावर असतो़; मात्र यंदा चित्र उलटेच आहे.

वर्धा : जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा पेरा संपण्याच्या मार्गावर असतो़; मात्र यंदा चित्र उलटेच आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४५२ हेक्टरवर पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यातही झालेली नोंद केवळ कपाशीची असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनचा पेरा अद्याप झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.साधारतत: मृग नक्षत्राच्या पावसात शेतकरी पेऱ्याला सुरुवात करतो. आर्द्राच्या सुरुवातील त्याचा पेरा संपतो; मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने तसे होत नसल्याचे चित्र आहे. मृग कोरडा गेला. यामुळे आर्द्रात पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. यात आर्द्रातही पावसाचा पत्ता नाही. आज ना उद्या पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत असताना काहींनी पेरण्या केल्या. मृगात आलेल्या तुरळक सरींनी काहींचे बियाणे अंकुरले. पुन्हा पाऊस येईल असे वाटत असताना पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेले बियाने सुकण्याच्या मार्गावर आले आहेत.जिल्ह्यात केवळ कपाशीचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यातही जिल्ह्यात केवळ तीनच तालुक्यात पेरा झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात वर्धा तालुक्यात ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. आर्वी तालुक्यात ८० तर कारंजा (घाडगे) तालुक्यात केवळ ७० हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. गत हंगामात जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यंदाची परिस्थिती मात्र तशी नाही. जिल्ह्यात अद्याप सोयाबीनचा पेरा झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. वास्तविकता मात्र वेगळीच झाली. जिल्ह्यात कपशीसोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीचे बियाणेही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी टाकून ठेवले आहेत. काही भागात आलेल्या पावसाच्या एक दोन सरींनी पेरलेले बियाणे उगविले आहेत. पाऊस आले नसल्याने अंकुरलेले बियाणे करपण्याच्या मार्गावर आले आहेत. तर काही भागात शेतकऱ्यांनी पेरलेल बियाणे पक्षी व उंदरांनी फस्त केले आहे. या कारणाने यंदा मोड येण्याची मोठी शक्यता बळावली आहे.यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)