शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जूनअखेरीस केवळ ४५१ हेक्टरवर पेरा

By admin | Updated: June 28, 2014 00:32 IST

जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा पेरा संपण्याच्या मार्गावर असतो़; मात्र यंदा चित्र उलटेच आहे.

वर्धा : जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा पेरा संपण्याच्या मार्गावर असतो़; मात्र यंदा चित्र उलटेच आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४५२ हेक्टरवर पेरा झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यातही झालेली नोंद केवळ कपाशीची असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनचा पेरा अद्याप झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.साधारतत: मृग नक्षत्राच्या पावसात शेतकरी पेऱ्याला सुरुवात करतो. आर्द्राच्या सुरुवातील त्याचा पेरा संपतो; मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने तसे होत नसल्याचे चित्र आहे. मृग कोरडा गेला. यामुळे आर्द्रात पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. यात आर्द्रातही पावसाचा पत्ता नाही. आज ना उद्या पाऊस येईल असे शेतकऱ्यांना वाटत असताना काहींनी पेरण्या केल्या. मृगात आलेल्या तुरळक सरींनी काहींचे बियाणे अंकुरले. पुन्हा पाऊस येईल असे वाटत असताना पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेले बियाने सुकण्याच्या मार्गावर आले आहेत.जिल्ह्यात केवळ कपाशीचा पेरा झाला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यातही जिल्ह्यात केवळ तीनच तालुक्यात पेरा झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात वर्धा तालुक्यात ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. आर्वी तालुक्यात ८० तर कारंजा (घाडगे) तालुक्यात केवळ ७० हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. गत हंगामात जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यंदाची परिस्थिती मात्र तशी नाही. जिल्ह्यात अद्याप सोयाबीनचा पेरा झाला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. वास्तविकता मात्र वेगळीच झाली. जिल्ह्यात कपशीसोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीचे बियाणेही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी टाकून ठेवले आहेत. काही भागात आलेल्या पावसाच्या एक दोन सरींनी पेरलेले बियाणे उगविले आहेत. पाऊस आले नसल्याने अंकुरलेले बियाणे करपण्याच्या मार्गावर आले आहेत. तर काही भागात शेतकऱ्यांनी पेरलेल बियाणे पक्षी व उंदरांनी फस्त केले आहे. या कारणाने यंदा मोड येण्याची मोठी शक्यता बळावली आहे.यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)