शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

भंगार वाहनांचे वाहनतळावर अतिक्रमण

By admin | Updated: July 17, 2017 02:10 IST

वाहनांची पासिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना देणे, अनधिकृत वाहनांवर कारवाई करणे आदी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

प्रशासकीय भवनातील आरटीओचा प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही बगललोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहनांची पासिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना देणे, अनधिकृत वाहनांवर कारवाई करणे आदी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पार पाडते. यामुळेच या विभागाला पिपरी येथे मोठी जागा देण्यात आली आहे; पण या विभागाची सर्व कामे प्रशासकीय भवनातील कार्यालयातूनच होत आहे. परिणामी, या परिसरात भंगार वाहनांचा राबता वाढला आहे. आता तर भंगार वाहनांनी वाहनतळावरच अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत अनधिकृत वाहनांचे परवाने निलंबित करीत ते जप्त करण्याची कारवाई केली जाते. यात विविध वाहने जप्त केली जातात. जप्तीतील ही भंगार झालेली वाहने ठेवण्याकरिता या विभागाला मोठी जागा देण्यात आली आहे. ही जागा पिपरी (मेघे) येथे मुख्य मार्गावर आहे. या ठिकाणी एक-दोन वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचे परवाने देण्याचे तसेच वाहन चालविता येते की नाही, हे तपासण्याचे काम केले जात होते; पण सध्या ही सर्व कामे प्रशासकीय भवन परिसरातील जागेतच होत असल्याचे दिसून येत आहे. वाहन चालकांची प्रात्याक्षिक परीक्षा पिपरी येथे घेतली जात असली तरी फारसे अधिकारी, कर्मचारी तेथे उपस्थित राहत असल्याचे दिसत नाही. या विभागाद्वारे काही वर्षांपूर्वी जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय भवन परिसरात ठेवण्यात आलेली आहेत. ही वाहने भंगार झाली असून जागेवर हलविण्याकरिताही त्यांना अन्य वाहनांचा वापर करावा लागतो. या परिसरात जिल्हाधिकारी शैलैश नवाल यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली. यात ही भंगार वाहने अकारण जागा व्यापत असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारत ही वाहने पिपरी (मेघे) येथील जागेवर हलविण्याचे निर्देश दिले. यावरून ही वाहने त्या जागेवर हलविणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. आरटीओ कार्यालयाकडून ही वाहने प्रशासकीय भवन परिसरात हलविण्यात आले. काही वाहने कॅन्टीनच्या मागील भागात, काही स्वच्छतागृहाजवळ अर्जनविस बसतात तेथे ठेवली तर बहुतांश वाहने वाहनतळावर ठेवण्यात आली आहेत. कर्मचारी तथा नागरिकांसाठी असलेल्या वाहनतळाची जागा आता या भंगार वाहनांनी घेतली आहे. परिणामी, नागरिकांना वाहने ठेवण्याकरिता जागा शोधावी लागते. बहुतांश कर्मचारी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वाहने ठेवत असल्याने या परिसरात ये-जा करण्याकरिता जागा राहत नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने याकडे लक्ष देत वाहन हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.