शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण; मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:46 IST

नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतातडीने काढण्याची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व शासकीय आणि रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांच्याकडे केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वर्धा उपविभागीय अधिकारी, आर्वी, तहसीलदार, आर्वी व ठाणेदार आर्वी यांनाही पाठविण्यात आले आहे.येथील घरकुल लाभार्थी बाबाराव मेश्राम व नीलेश बाबाराव मेश्राम यांनी घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा दाखविली; परंतु प्रत्यक्षात शासकीय व रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेले आहे. त्यामुळे रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. ही बाब ग्रामसेविकेच्या निदर्शनास आणून दिली.त्यांनी घरकूल लाभार्थ्यास समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाभार्थी अरेरावी करीत आहे. शिवाय बांधकाम सुरूच ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने या रहदारीच्या रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामुळे शाळेत जाणाºया लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून केव्हाही अपघात होऊ शकतो.ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, काही ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण करणाºया घरकुल लाभार्थ्याची पाठराखण करीत आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा वाद निर्माण होत आहे. अपघात घडल्यास ग्रामपंचायत सचिव, सरपंच व सदस्य जबाबदार असेल, असे ग्रामस्थ बोलत आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत शासकीय व रहदारीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अजय कडू व गावकºयांनी केलेली आहे.घरकूल दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर बांधकाम करणाऱ्याला समज नोटीस दिल्यावरही त्याचे बांधकाम सुरू होते. अतिक्रमणधारक ऐकण्यास तयार नाही.मनोज परतेकी, सरपंच, माटोडा (बे.)रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याने ग्रा.पं.च्या जागेवर घरकूल बांधण्याकरिता खड्डे खोदकाम करून पिल्लर उभारणीकरिता पिंजरे उभे केले आहे. त्याला काम करण्यास मनाई केल्यानंतरही काम सुरूच होते. पोलिसांत तक्रार केल्यानंतर काम बंद केले.दुर्गा चरडे, ग्रामसेविका, माटोडा (बे.)