शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गावठाणच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:57 IST

येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे.

ठळक मुद्देरोहणा येथील प्रकार : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग व भूमापन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे.आपल्या घरासमोरील रस्ता व गावठाणची खाली जागा यावर आधी साध्या काड्या उभ्या करून त्यावर सावलीसाठी तुराट्या ठेवायच्या, नंतर हळूहळू लोखंडी खांब उभे केले. टिना टाकायच्या, काही साधने, पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय उभा करायचा व कालांतराने ही जागा माझीच आहे, येथे २४ वर्षांपासून वास्तव्य असल्याने माझा हक्क आहे, अशी मानसिकता रोहण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत असल्याने गावातील अनेक ठिकाणचे रस्ते पूर्वीच अरुंद झाले असताना आता गांधी वॉर्डातील आठवडी बाजार परिसरातील मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा मोठा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याच वॉर्डात एका खाली जागेवर एका व्यावसायिकाचा लाकडी ठेला आहे.त्या ठेल्यातून व्यावसायिक आपला व्यवसाय करतो. पण, दोन वर्षापूर्वी या जागेवर जागा मालकाने पक्के घर बांधले. त्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर व्यावसायिकाचा ठेला आहे. त्यामुळे घरमालक शेतकऱ्यांची रहदारी प्रभावित झाली आहे. हा ठेला दरवाज्यासमोरून उचलावा म्हणून घरमालकाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. लोकशाही दिनात शिवाय महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडेही तक्रार नोंदविली आहे. ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने वाद समाझोत्यातून मिटावा म्हणून प्रयत्न केला. पण, दोन वर्षांपासून तिढा सुटू न झकल्याने घरमालकाचे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविणे सुरूच आहे.अशा प्रकारे सुरूवातीला तात्पुरते व कालांतराने पक्के बांधकाम करून रस्त्यावर व गावठाणच्या जागेवर आपला हक्क सांगण्याच्या गावकरी व व्यावसायिकांच्या मानसिकतेमुळे रस्ते अरूंदच झाले नाही तर भांडणाचेही हे अतिक्रमण कारण ठरत आहे. तरी अतिक्रमण होता क्षणीच संबंधीत प्रशासनाने दखल घेतल्यास पुढील समया व वाद टाळता येतात एवढे मात्र खरे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण