शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी....

ठळक मुद्देस्थायी पट्टे देण्याची मागणी : युवा परिवर्तनचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारला युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्त्वात झाशी राणी चौकातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मोर्चात संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक सहभागी झाले होते. अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमजुर, गवंडी बांधकाम कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हे व्यक्ती आपल्या कुटूंबाच्या निवाºयासाठी जमीन विकत घेऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून संसार थाटला आहे. सदर अतिक्रमण धारकांकडून दंडाच्या स्वरूपात रक्कम संबंधीत प्रशासन घेते. परंतु, त्यांना जमिनीचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.लोकप्रतिनिधींकडून या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्यातील २५ गावांमधील अतिक्रमण धारकांना राहत असलेल्या जागेचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अतिक्रमण धारक आपल्या न्यायीक मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मोर्चाचे नेतृत्त्व निहाल पांडे, पलाश उमाटे, राहूल मिश्रा, गौरव वानखेडे, सुरज गायकवाड, शुभम मोकलकर, सौरभ माकोडे, अभिषेक बाळबुधे, साहिल नाडे, शुभम कुरील, ऋषभ मेंढुले, धरम शेंडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ व आदींनी केले. मोर्चात सावंगी(मेघे), पिपरी(मेघे), म्हसाळा, नालवाडी, गणेशपूर, पुलई, मांडवा, नागापुर, कुरझडी (जामठा), सेलसुरा, सिंदी(मेघे), पांढरकवडा, मांडवगड, वायगाव (नि.), पालोती, भुगाव, करंजी भोगे, सोनेगाव (स्टे.) येथील अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.