शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अतिक्रमण हटविले; साहित्य रस्त्यावरच

By admin | Updated: April 19, 2017 00:39 IST

वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते.

वाहतुकीची कोंडी : सामान्य नागरिकांनाही त्रास तळेगाव (टा.) : वर्धा-आजनसरा मार्गावर असलेल्या या गावात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण केले होते. रस्ता निर्मितीकरिता बांधकाम विभागाकडून ते अतिक्रमण काढण्यात आले. या बाबीला महिना लोटत असताना मलबा हटविण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याची व्यवस्थाही मोडकळीस आल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. गावातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मोजमाप करीत काहींचे अतिक्रमण हटविले. उर्वरित अतिक्रमण दोन वर्षांपासून हटविण्यात आले नव्हते. काहींनी यादीत असताना घरे व दुकाने थाटली. परिणामी, प्रशासनाने पुन्हा मोजमाप करीत महिनाभरापूर्वी उर्वरित अतिक्रमणही तीन जेसीबीच्या साह्याने हटविले. मोठी घरे व दुकाने पाडली गेली. या मोहिमेस एक महिना लोटत असताना गावातील मलबा उचलण्यात आला नाही. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय सामान्यांनाही याला त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यालगत अनेक दुकाने असल्याने दुकानांसमोर विटा, माती, मोठे दगड जैसे थे पडून आहे. मंगहवारी याच मार्गावर झेंडा चौकाजवळ विद्युत कंपनीचा सिमेंट खांब टँकरची धडक लागल्याने कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यामुळे काही तास विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. पाडलेल्या इमारतींचे अवशेष शिल्लक असल्याने वाहने जाण्यासही जागा राहिली नाही. प्रशासनाने सदर मलबा उचलावा वा नालीचे खोदकाम करावे, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)