शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:38 IST

बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांकडे तक्रार : कारवाई होत नसल्याने नागरिकात असंतोष

आॅनलाईन लोकमतवर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात होत असताना वन अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे चितोडा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राज्याचे वनमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वनविभाग आता काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.बोरगाव (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत चितोडा रस्त्यावर वनविभागाची जमीन आहे. या जमिनीवरील सर्व्हे क्र. ६५/१ व ६५/२, ६६, ७२, १८७ वर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला अनेकदा नागरिकांनी माहिती दिली; पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यास ते काढण्याचे अधिकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. ते पोलीस प्रशासनाची मदत घेत आपल्या जागा मोकळ्या करून घेऊ शकतात; पण बोरगाव येथील या प्रकरणाकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.या परिसराला भेट देऊन माहिती घेतली असता अनेक नागरिकांनी बांबूच्या ताट्या आणून येथे झोपड्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. दररोज शेकडो नागरिक वन जमीन साफ करून तेथे आपली जागा राखून ठेवत आहेत. या सर्व अवैध प्रकाराकडे वनाधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. यामुळे संतप्त झालेल्या चितोडा परिसरातील नागरिकांनी २ मार्च २०१७ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री, वनमंत्री व ग्रामीण विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आता ८ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा ६० लोकांनी सामूहिकरित्या अतिक्रमण केले आहे. दररोज येथे जागेच्या वादातून नागरिकांमध्ये कलह निर्माण होत आहे. यामुळे या परिसरातील शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. वनविभाग गप्प का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. बोरगाव (मेघे) ते चितोडा हा रस्ता या अतिक्रमणामुळे अत्यंत अरूंद झाला आहे. ८० फुटाचा रस्ता आता ८ फुट राहिला आहे. यामुळे चितोडा येथील नागरिकांना वहिवाटीलाही अडचण निर्माण झाली आहे. याकडे वनमंत्र्यांनी लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चितोडाच्या नागरिकांनी केली आहे.जागेच्या वादातून दररोज होतात भांडणेबोरगाव (मेघे) ते चितोडा मार्गावर अतिक्रमण करण्यात येत आहे. नागरिक दररोज आपल्या झोपड्या लावून जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी, आपसांतच त्यांचे भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हा प्रकार टाळण्याकरिता वन विभाग, महसूल विभाग तथा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.चितोडा मार्गावरील अतिक्रमण सर्व्हे क्र. ६७ मध्ये झालेले आहे. सदर परिसराची पाहणी केली असून ती जागा महसूल विभागाची आहे. वन विभागाची जमीन नसल्याने आम्हाला कार्यवाही करता येत नाही. याबाबत वनमंत्री, उपवनसंरक्षक तथा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अहवाल पाठविला आहे.- एस.एस. बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, वर्धा.