शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वनविभागाच्या जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:38 IST

बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांकडे तक्रार : कारवाई होत नसल्याने नागरिकात असंतोष

आॅनलाईन लोकमतवर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या चितोडा मार्गावर वनविभागाच्या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अतिक्रमण केले आहे. मोठ्या प्रमाणात होत असताना वन अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे चितोडा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राज्याचे वनमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वनविभाग आता काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.बोरगाव (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत चितोडा रस्त्यावर वनविभागाची जमीन आहे. या जमिनीवरील सर्व्हे क्र. ६५/१ व ६५/२, ६६, ७२, १८७ वर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला अनेकदा नागरिकांनी माहिती दिली; पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यास ते काढण्याचे अधिकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. ते पोलीस प्रशासनाची मदत घेत आपल्या जागा मोकळ्या करून घेऊ शकतात; पण बोरगाव येथील या प्रकरणाकडे वनविभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.या परिसराला भेट देऊन माहिती घेतली असता अनेक नागरिकांनी बांबूच्या ताट्या आणून येथे झोपड्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. दररोज शेकडो नागरिक वन जमीन साफ करून तेथे आपली जागा राखून ठेवत आहेत. या सर्व अवैध प्रकाराकडे वनाधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. यामुळे संतप्त झालेल्या चितोडा परिसरातील नागरिकांनी २ मार्च २०१७ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री, वनमंत्री व ग्रामीण विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आता ८ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा ६० लोकांनी सामूहिकरित्या अतिक्रमण केले आहे. दररोज येथे जागेच्या वादातून नागरिकांमध्ये कलह निर्माण होत आहे. यामुळे या परिसरातील शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. वनविभाग गप्प का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. बोरगाव (मेघे) ते चितोडा हा रस्ता या अतिक्रमणामुळे अत्यंत अरूंद झाला आहे. ८० फुटाचा रस्ता आता ८ फुट राहिला आहे. यामुळे चितोडा येथील नागरिकांना वहिवाटीलाही अडचण निर्माण झाली आहे. याकडे वनमंत्र्यांनी लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चितोडाच्या नागरिकांनी केली आहे.जागेच्या वादातून दररोज होतात भांडणेबोरगाव (मेघे) ते चितोडा मार्गावर अतिक्रमण करण्यात येत आहे. नागरिक दररोज आपल्या झोपड्या लावून जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी, आपसांतच त्यांचे भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हा प्रकार टाळण्याकरिता वन विभाग, महसूल विभाग तथा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित सदर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.चितोडा मार्गावरील अतिक्रमण सर्व्हे क्र. ६७ मध्ये झालेले आहे. सदर परिसराची पाहणी केली असून ती जागा महसूल विभागाची आहे. वन विभागाची जमीन नसल्याने आम्हाला कार्यवाही करता येत नाही. याबाबत वनमंत्री, उपवनसंरक्षक तथा जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अहवाल पाठविला आहे.- एस.एस. बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, वर्धा.