शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

रिकामे भूखंड ठरतात डोकेदुखी

By admin | Updated: October 21, 2016 02:02 IST

नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अस्वच्छता, कचऱ्यामुळे दुर्गंधी, नागरिक त्रस्तवर्धा : नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही. असे भूखंड कचरा, घाणीने माखत असल्याने ते डोकेदुखी ठरत असल्याचेच दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात अनेक नागरिकांनी प्रॉपर्टी म्हणून भूखंडांची खरेदी करून ठेवली आहे. अनेक भूखंडांवर घरांचे बांधकाम झाले तर बहुतांश भूखंड रिक्त आहेत. या रिक्त भूखंडांवर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा शहरात रामनगर, आर्वी नाका परिसर, साईनगर, दयालनगर, इतवारा बाजार परिसर यासह अनेक भागांमध्ये हा प्रकार पाहावयास मिळतो. रिकाम्या भूखंडांवर परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. यातूनच डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. रिकामे भूखंड वा अर्धवट बांधकामे अनैतिक कृत्यांचे अड्डेही बनल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ शहरातच आहे, असे नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही पाहावयास मिळतो. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये रिकामे भूखंड दिसून येत असून त्यावर कचऱ्याचे साम्राज्यही पसरलेले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण स्थानिक स्वराज्य संस्था त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव पर्यायाने विविध आजारांचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)