शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

रिकामे भूखंड ठरतात डोकेदुखी

By admin | Updated: October 21, 2016 02:02 IST

नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अस्वच्छता, कचऱ्यामुळे दुर्गंधी, नागरिक त्रस्तवर्धा : नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही. असे भूखंड कचरा, घाणीने माखत असल्याने ते डोकेदुखी ठरत असल्याचेच दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात अनेक नागरिकांनी प्रॉपर्टी म्हणून भूखंडांची खरेदी करून ठेवली आहे. अनेक भूखंडांवर घरांचे बांधकाम झाले तर बहुतांश भूखंड रिक्त आहेत. या रिक्त भूखंडांवर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा शहरात रामनगर, आर्वी नाका परिसर, साईनगर, दयालनगर, इतवारा बाजार परिसर यासह अनेक भागांमध्ये हा प्रकार पाहावयास मिळतो. रिकाम्या भूखंडांवर परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. यातूनच डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. रिकामे भूखंड वा अर्धवट बांधकामे अनैतिक कृत्यांचे अड्डेही बनल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ शहरातच आहे, असे नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही पाहावयास मिळतो. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये रिकामे भूखंड दिसून येत असून त्यावर कचऱ्याचे साम्राज्यही पसरलेले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण स्थानिक स्वराज्य संस्था त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव पर्यायाने विविध आजारांचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)