शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिकामे भूखंड ठरतात डोकेदुखी

By admin | Updated: October 21, 2016 02:02 IST

नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अस्वच्छता, कचऱ्यामुळे दुर्गंधी, नागरिक त्रस्तवर्धा : नागरिकांकडून प्रॉपर्टी असावी म्हणून अनेक ठिकाणी भूखंडांची खरेदी करून ठेवली जाते; पण त्यांचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही. असे भूखंड कचरा, घाणीने माखत असल्याने ते डोकेदुखी ठरत असल्याचेच दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात अनेक नागरिकांनी प्रॉपर्टी म्हणून भूखंडांची खरेदी करून ठेवली आहे. अनेक भूखंडांवर घरांचे बांधकाम झाले तर बहुतांश भूखंड रिक्त आहेत. या रिक्त भूखंडांवर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा शहरात रामनगर, आर्वी नाका परिसर, साईनगर, दयालनगर, इतवारा बाजार परिसर यासह अनेक भागांमध्ये हा प्रकार पाहावयास मिळतो. रिकाम्या भूखंडांवर परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. यातूनच डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. रिकामे भूखंड वा अर्धवट बांधकामे अनैतिक कृत्यांचे अड्डेही बनल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ शहरातच आहे, असे नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही पाहावयास मिळतो. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये रिकामे भूखंड दिसून येत असून त्यावर कचऱ्याचे साम्राज्यही पसरलेले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण स्थानिक स्वराज्य संस्था त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव पर्यायाने विविध आजारांचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)