शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रिकामे प्लॉट झुडपांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:57 IST

शहरातील रिकामे प्लॉट, खंडर झालेल्या इमारती तथा पालिकेची ओपन स्पेस सध्या झुडपांच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडली आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेचे दुर्लक्ष : सरपटणाºया प्राण्यांचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रिकामे प्लॉट, खंडर झालेल्या इमारती तथा पालिकेची ओपन स्पेस सध्या झुडपांच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार शहरात कुण्या एकाच भागात नव्हे तर बºयाच ठिकाणी पाहावयास मिळत आहे. पालिका तथा स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.नगर पालिकेच्या हद्दीत येणाºया तथा लगतच्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील अनेक रिकाम्या प्लॉटवर झुडपांचे साम्राज्य दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तथा काही संस्थांना हस्तांतरित केलेल्या जागाही झुडपे आणि घाणीच्या विळख्यात अडकल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठाकरे मार्केट परिसरात सांस्कृतिक भवनाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी काही मोकळी जागा आहे. सध्या या जागेवर झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या जागेवर घोडे बांधले जात होते. यासाठी संबंधितांनी जागा जेसीबीने उखरून मोकळी केली आहे. परिणामी, झुडपांमध्ये आणखी वाढ झाली आहे. यामुळे सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. असाच प्रकार हुतात्मा स्मारक परिसरात दिसून येत आहे. हुतात्मा स्मारक देखभाल, दुरूस्तीसाठी एका संस्थेला देण्यात आले आहे. या परिसरातील स्मारक सोडले तर उर्वरित जागेवर गवत वाढले असून झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. नालवाडी, पिपरी (मेघे), सेवाग्राम रोड, बोरगाव रोड तथा सिंदी (मेघे) परिसरातही असे अनेक रिकामे प्लॉट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओपन स्पेसवर घाणीचे साम्राज्य दिसून येते. परिणामी, नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. संबंधित ग्रा.पं. तथा वर्धा नगर पालिकेने याकडे लक्ष देत झुडपे काढून तथा घाण साफ करून रिकामे प्लॉट उपयोगी आणावेत. खासगी प्लॉट धारकांना नोटीस देत कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तथा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांची लागणशहरातील तथा लगतच्या ग्रामीण भागात अनेक रिकामे प्लॉट तथा रिकाम्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिक जेरीस आले आहेत. स्वच्छता मोहिमेचा गवगवा केला जात असला तरी शहरातीलच अनेक भागांपर्यंत ही मोहीम पोहोचलीच नसल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाने लक्ष देणे गरजेचेवर्धा शहर तथा लगतच्या ग्रामीण भागातील ही समस्या दूर करण्याकरिता नगर पालिका तथा संबंधित ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय प्लॉट धारक आणि परिसरातील नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.