शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिला कक्ष बंद होईल तो दिवस स्त्री सशक्तीकरणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:44 IST

आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते.

ठळक मुद्देसना पंडीत : स्त्री-पुरुष समानता विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते. स्त्रीच्या अस्तित्वाचा, सक्षमीकरणाचा विचार करावा लागतो. ज्या दिवशी स्त्री-पुरुष हा भेद संपुष्टात येईल व अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबून महिला कक्ष बंद होतील तो दिवस खºया अर्थाने सशक्तीकरणाचा राहिल, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक सना पंडित यांनी केले.स्थानिक लोक महाविद्यालयात महिला कक्ष, महिला अध्ययन व सेवा केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोग वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री-पुरूष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश भोयर, प्राचार्य डॉ. विनाश साहुरकर, महिला कक्षाच्या प्रा.डॉ. सुचित्रा पाटणे, डॉ. सरिता गणराज आदींची उपस्थिती होती. .सना पंडित पुढे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदी सक्षम स्त्रियांचे उदाहरण सध्याच्या स्त्रीने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कौटंूबिक हिंसाचारात भारत वरच्या क्रमांकावर आहे. स्त्रियांवर सतत अत्याचार होत आहेत. कुठे गेली स्त्री शक्ती? अजून किती अत्याचार आपण सहन करणार? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.भावनेच्या भरात स्त्री नको त्या गोष्टी करतात. राणी लक्ष्मीबाईने सैनिकांची फौज उभी केली होती. पण आपण स्त्रिया एकत्र येत नाहीत. समजाने सुद्धा स्त्रीला स्त्री चा खरा दर्जा न देता कायमची माता बनविली आहे. प्रत्येक स्त्रीने स्वत:चे व्यक्तिमत्व असे घडवा की, आपल्याला फॅशनची गरजच पडणार नाही. नकारही देता आला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कक्ष प्रमुख डॉ. सुचित्रा पाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महिला लोक आयोगाच्या नंदिनी बर्वे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सोनाली बन्सोड, प्रा. सुरकार, प्रा. सुनील पाटणे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणाच्या जोरावर स्त्रीने भरारी घ्यावी - कोटेवारशिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाअभावी महिला पूर्वी चुल आणि मुल पर्यंत सीमित होत्या. सध्या शिक्षणाचे दालन महिलांसाठीही उघडे आहे. विविध प्रकारचे शिक्षण घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन डॉ. कोटेवार यांनी केले.