शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दौऱ्याच्या नावावर कर्मचारी गैरहजर

By admin | Updated: April 26, 2017 00:24 IST

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे.

शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षकांना निवेदन : कृषी कार्यालयातील प्रकार आष्टी (शहीद): येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. सुट्या नसताना एवढे कर्मचारी कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. येथील तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी हे दोन्ही पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. सद्या दोन्ही पदांचा कारभार कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेठकर पाहत आहे. त्यांना मिटींग व आढावा सभा यासाठी वारंवार वर्धा, नागपूर येथे जावे लागत असल्याने कार्यालय वाऱ्यावर राहते. कर्मचारी व कृषी सहाय्यक ही मंडळी याच संधीचा फायदा घेत गायब होतात. कार्यालयात शेतकरी आल्यावर त्यांना कर्मचारी व अधिकारी नसल्याने परत जावे लागते. महिनाभरावर खरीप हंगाम येवून पडला आहे. त्यामुळे शेतकरी विविध समस्या घेवून तालुकास्थळी येतात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही असे चित्र दिसत आहे. आष्टी तालुक्यात मागील काही वर्षाआधी शेताच्या बांधावर झालेली कामे पावसाने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतात, बंधारा फुटल्यामुळे साहुर, माणीकवाडा, तारासावंगा मौजात जमीन पडीत राहत आहे. याप्रकरणी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. खडकी, भारसवाडा, चिस्तुर या मौजातील शेतकऱ्यांनी शेतीच्या केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आष्टी तालुक्याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमित तालुका कृषी अधिकारी असल्यास कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा शेतकऱ्याची आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने सतत खाली राहते. याप्रकरणी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागणार व कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार. -अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आष्टी (श)