शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

दौऱ्याच्या नावावर कर्मचारी गैरहजर

By admin | Updated: April 26, 2017 00:24 IST

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे.

शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षकांना निवेदन : कृषी कार्यालयातील प्रकार आष्टी (शहीद): येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतत दौऱ्याच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. सुट्या नसताना एवढे कर्मचारी कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. येथील तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी हे दोन्ही पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. सद्या दोन्ही पदांचा कारभार कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेठकर पाहत आहे. त्यांना मिटींग व आढावा सभा यासाठी वारंवार वर्धा, नागपूर येथे जावे लागत असल्याने कार्यालय वाऱ्यावर राहते. कर्मचारी व कृषी सहाय्यक ही मंडळी याच संधीचा फायदा घेत गायब होतात. कार्यालयात शेतकरी आल्यावर त्यांना कर्मचारी व अधिकारी नसल्याने परत जावे लागते. महिनाभरावर खरीप हंगाम येवून पडला आहे. त्यामुळे शेतकरी विविध समस्या घेवून तालुकास्थळी येतात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही असे चित्र दिसत आहे. आष्टी तालुक्यात मागील काही वर्षाआधी शेताच्या बांधावर झालेली कामे पावसाने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतात, बंधारा फुटल्यामुळे साहुर, माणीकवाडा, तारासावंगा मौजात जमीन पडीत राहत आहे. याप्रकरणी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. खडकी, भारसवाडा, चिस्तुर या मौजातील शेतकऱ्यांनी शेतीच्या केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आष्टी तालुक्याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमित तालुका कृषी अधिकारी असल्यास कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा शेतकऱ्याची आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने सतत खाली राहते. याप्रकरणी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागणार व कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार. -अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आष्टी (श)