शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर

By admin | Updated: March 8, 2017 01:57 IST

चारित्र्य जोपासून देश उभा करण्याचे शिक्षण संतांच्या दरबारातच मिळते. जीवनातील नम्रता, आचरणातील

सयाजी महाराज : समर्थ लहानुजी महाराज जयंती महोत्सव टाकरखेड : चारित्र्य जोपासून देश उभा करण्याचे शिक्षण संतांच्या दरबारातच मिळते. जीवनातील नम्रता, आचरणातील शुद्धता, चित्तातील दृढता, बुद्धीतील व्यापकता, पर्यायाने देशात समभावाने वागण्याची शिकवणूक संताच्या सहवासातून मिळते. शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर अधिक आहे, असे प्रतिपादन सयाजी महाराज यांनी केले. ते समर्थ लहानुजी महाराज यांच्या जयंती महोत्सवात मार्गदर्शन करताना बोलत होते. सयाजी महाराज पुढे म्हणाले, संत संगतीतून जीवन कसे जगावे तसेच सेवेची महती कळते. चित्त स्थिर होते. त्यातून सुख-दु:खाकडे समान भावनेने पाहण्याचे सामर्थ्य येते. लहानुजी महाराज शेतात काम करायचे. दर्शनाला आलेल्या भाविकांना ते शेतात काम करायला लावायचे. काळ्या आईशी संबंध तोडू नका, तीच तुम्हाला जगवेल, असा यातून ते भाविकांना उपदेश देत होते. समर्थ आडकूजी महाराजांनी घडविला हा शिष्यसंप्रदाय अनिष्ठाला दूर करण्याचे सामर्थ्य राखतो. आध्यात्मिक प्रचिती ही जीवन मूल्य सांभाळण्यासह देशसेवेला हातभार लावण्याच्या कामाला बळ देते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संत पुजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान संस्थानाच्यावतीने अंबादास महाराज, सयाजी महाराज, अत्रे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. गोपालकाल्याचे कीर्तन प्रकाश महाराज वाघ यांनी केले. यावेळी स्मरणीकेचे लोकार्पण करण्यात आले. समर्थ लहानुजी महाराजांच्या पालखीचे पुजन डॉ. अरूण पावडे, उपकार्यकारी संचालक महल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी-मिरवणुकीने गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. यात विविध भजनमंडळाचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अहवालाचे वाचन बाळासाहेब पावडे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)