शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर

By admin | Updated: March 8, 2017 01:57 IST

चारित्र्य जोपासून देश उभा करण्याचे शिक्षण संतांच्या दरबारातच मिळते. जीवनातील नम्रता, आचरणातील

सयाजी महाराज : समर्थ लहानुजी महाराज जयंती महोत्सव टाकरखेड : चारित्र्य जोपासून देश उभा करण्याचे शिक्षण संतांच्या दरबारातच मिळते. जीवनातील नम्रता, आचरणातील शुद्धता, चित्तातील दृढता, बुद्धीतील व्यापकता, पर्यायाने देशात समभावाने वागण्याची शिकवणूक संताच्या सहवासातून मिळते. शाळेतील शिक्षणाचा भर चारित्र्यापेक्षा चातुर्यावर अधिक आहे, असे प्रतिपादन सयाजी महाराज यांनी केले. ते समर्थ लहानुजी महाराज यांच्या जयंती महोत्सवात मार्गदर्शन करताना बोलत होते. सयाजी महाराज पुढे म्हणाले, संत संगतीतून जीवन कसे जगावे तसेच सेवेची महती कळते. चित्त स्थिर होते. त्यातून सुख-दु:खाकडे समान भावनेने पाहण्याचे सामर्थ्य येते. लहानुजी महाराज शेतात काम करायचे. दर्शनाला आलेल्या भाविकांना ते शेतात काम करायला लावायचे. काळ्या आईशी संबंध तोडू नका, तीच तुम्हाला जगवेल, असा यातून ते भाविकांना उपदेश देत होते. समर्थ आडकूजी महाराजांनी घडविला हा शिष्यसंप्रदाय अनिष्ठाला दूर करण्याचे सामर्थ्य राखतो. आध्यात्मिक प्रचिती ही जीवन मूल्य सांभाळण्यासह देशसेवेला हातभार लावण्याच्या कामाला बळ देते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संत पुजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान संस्थानाच्यावतीने अंबादास महाराज, सयाजी महाराज, अत्रे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. गोपालकाल्याचे कीर्तन प्रकाश महाराज वाघ यांनी केले. यावेळी स्मरणीकेचे लोकार्पण करण्यात आले. समर्थ लहानुजी महाराजांच्या पालखीचे पुजन डॉ. अरूण पावडे, उपकार्यकारी संचालक महल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी-मिरवणुकीने गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. यात विविध भजनमंडळाचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अहवालाचे वाचन बाळासाहेब पावडे यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)