शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यावर प्रशासनाचा भर

By admin | Updated: October 13, 2014 23:25 IST

लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर

वर्धा : लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. यावर्षी विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनाही या मोहीम हिरहिरीने भाग घेताना दिसत होते. एकूणच यंदाच्या मतदार जागृतीचे व्यापक स्वरुप बघता मतदानाचा टक्का वाढण्याचे शुभ संकेत मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी सर्वाधिक असल्याचे बघायला मिळते. या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांचा क्रमांक लागतो. या नंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा क्रमांक लागतो. परिणामी एकूण मतदारांच्या सुमारे २० ते ३० टक्के मत घेणारा घेणारा उमेदवार निवडला जातो. वास्तविक, त्या विजयी उमेदवाराला अपेक्षित जनसमर्थन राहात नाही. तरीही तो आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. लोकशाहीत १०० टक्के लोकसहभाग अपेक्षित आहे. तरच लोकशाही बळकट झाली असे म्हणता येईल. मात्र मागील निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितल्यास अपवाद वगळता सरासरी ५० ते ६० टक्के मतदान होताना दिसून येते. या निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही कामाला लागली होती.वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदार जागृतीचे भव्य फलक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करीत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागातील सामाजिक संघटनांनीही उडी घेतली होती. या सोबतच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मतदानासाठी नागरिकांना प्रेरीत करण्यासाठी शपथ दिली.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनीही ही शपथ घेतली आहे. मागील काही दिवसांपासून प्रचार रॅल्यांप्रमाणेच मतदार जागृतीचे कार्य जोरात सुरू आहे. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल, असे एकंदर चित्र वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात बघायला मिळत आहे. २००९ च्या निवडणुकीत केवळ ६५.४२ टक्के नागरिकांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्येही महिला मतदारांची टक्केवारी केवळ ६१.३८ इतकी होती, तर पुरुष मतदानाची टक्केवारी ६९.०९ इतकी होती. यातही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)