शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

मतदानाचा टक्का वाढविण्यावर प्रशासनाचा भर

By admin | Updated: October 13, 2014 23:25 IST

लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर

वर्धा : लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. यावर्षी विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनाही या मोहीम हिरहिरीने भाग घेताना दिसत होते. एकूणच यंदाच्या मतदार जागृतीचे व्यापक स्वरुप बघता मतदानाचा टक्का वाढण्याचे शुभ संकेत मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी सर्वाधिक असल्याचे बघायला मिळते. या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांचा क्रमांक लागतो. या नंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा क्रमांक लागतो. परिणामी एकूण मतदारांच्या सुमारे २० ते ३० टक्के मत घेणारा घेणारा उमेदवार निवडला जातो. वास्तविक, त्या विजयी उमेदवाराला अपेक्षित जनसमर्थन राहात नाही. तरीही तो आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. लोकशाहीत १०० टक्के लोकसहभाग अपेक्षित आहे. तरच लोकशाही बळकट झाली असे म्हणता येईल. मात्र मागील निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितल्यास अपवाद वगळता सरासरी ५० ते ६० टक्के मतदान होताना दिसून येते. या निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही कामाला लागली होती.वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदार जागृतीचे भव्य फलक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करीत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागातील सामाजिक संघटनांनीही उडी घेतली होती. या सोबतच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मतदानासाठी नागरिकांना प्रेरीत करण्यासाठी शपथ दिली.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनीही ही शपथ घेतली आहे. मागील काही दिवसांपासून प्रचार रॅल्यांप्रमाणेच मतदार जागृतीचे कार्य जोरात सुरू आहे. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल, असे एकंदर चित्र वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात बघायला मिळत आहे. २००९ च्या निवडणुकीत केवळ ६५.४२ टक्के नागरिकांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्येही महिला मतदारांची टक्केवारी केवळ ६१.३८ इतकी होती, तर पुरुष मतदानाची टक्केवारी ६९.०९ इतकी होती. यातही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)