शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मतदानाचा टक्का वाढविण्यावर प्रशासनाचा भर

By admin | Updated: October 13, 2014 23:25 IST

लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर

वर्धा : लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार मतदार जागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. यावर्षी विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनाही या मोहीम हिरहिरीने भाग घेताना दिसत होते. एकूणच यंदाच्या मतदार जागृतीचे व्यापक स्वरुप बघता मतदानाचा टक्का वाढण्याचे शुभ संकेत मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी सर्वाधिक असल्याचे बघायला मिळते. या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांचा क्रमांक लागतो. या नंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा क्रमांक लागतो. परिणामी एकूण मतदारांच्या सुमारे २० ते ३० टक्के मत घेणारा घेणारा उमेदवार निवडला जातो. वास्तविक, त्या विजयी उमेदवाराला अपेक्षित जनसमर्थन राहात नाही. तरीही तो आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. लोकशाहीत १०० टक्के लोकसहभाग अपेक्षित आहे. तरच लोकशाही बळकट झाली असे म्हणता येईल. मात्र मागील निवडणुकांमधील मतांची टक्केवारी बघितल्यास अपवाद वगळता सरासरी ५० ते ६० टक्के मतदान होताना दिसून येते. या निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही कामाला लागली होती.वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात मतदार जागृतीचे भव्य फलक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करीत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागातील सामाजिक संघटनांनीही उडी घेतली होती. या सोबतच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मतदानासाठी नागरिकांना प्रेरीत करण्यासाठी शपथ दिली.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनीही ही शपथ घेतली आहे. मागील काही दिवसांपासून प्रचार रॅल्यांप्रमाणेच मतदार जागृतीचे कार्य जोरात सुरू आहे. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल, असे एकंदर चित्र वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात बघायला मिळत आहे. २००९ च्या निवडणुकीत केवळ ६५.४२ टक्के नागरिकांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्येही महिला मतदारांची टक्केवारी केवळ ६१.३८ इतकी होती, तर पुरुष मतदानाची टक्केवारी ६९.०९ इतकी होती. यातही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)