शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

अभियांत्रिकीच्या जागा यंदाही रिक्तच प्रवेशाचे निकष बदलले

By admin | Updated: May 11, 2014 00:30 IST

अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे.

गुणांची टक्केवारी वाढली

वर्धा : अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे. पीसीएम गटात ४५ टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांलाही अभियांत्रिकीकरिता प्रवेश दिला जात होता; मात्र राज्य शासनाने यात पुन्हा बदल करून जूनाच ५० टक्क्यांचा पात्रता निकष पुन्हा लागू केला आहे. परिणामी पूर्वीच रिक्त जागांची काळजी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर या निर्णयाने काळजीत अधिक भरच पडली आहे. याबाबत वृत्त असे की, बारावी विज्ञान शाखेतील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांकरिता तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी पात्रता निकष तयार केले आहे. यानुसार प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबत भौतिकशास्त्र, गणित अनिवार्य विषय व त्याबरोबर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, व्होकेशनल यापैकी एक विषय असे तीन विषयाचे एकत्रित गुण असे किमान ५० टक्के प्राप्त करणे अनिवार्य होते. मागासवर्गीय व अपंग उमेदवारांसाठी हाच निकष ४५ टक्के होता; मात्र गत काही वर्षांपासून अभियांत्रिकीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. प्रवेशासंबंधी अडचणींवर विचार करून पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी पीसीएम गटात ४५ टक्के गुणांवर अभियांत्रिकीत प्रवेश दिला जात होता. मागासवर्गीयांकरिता ही टक्केवारी ४० वर आली होती. यात पुन्हा ५ टक्क्याने वाढ केली असल्याने जूनाच निकष राज्यात लागू झाला आहे. या सत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे. या टक्केवारीतील फरकाचा परिणाम रिक्त जागांवर होणार असल्याचे दिसून येते. कारण ४५ टक्के हा पात्रता निकष असतानाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त असायच्या. आता तर निकष वाढविल्याने विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ अभियांत्रिकीकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ काही अंशी कमी झाला. महाविद्यालयातील रिक्त जागा हा त्याचाच दाखला आहे. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पूर्वी हमखास रोजगार मिळत होता; मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कमी झाला. शिवाय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने हा परिणाम जाणवतो.