शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

अभियांत्रिकीच्या जागा यंदाही रिक्तच प्रवेशाचे निकष बदलले

By admin | Updated: May 11, 2014 00:30 IST

अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे.

गुणांची टक्केवारी वाढली

वर्धा : अभियांत्रिकीच्या प्रवेश पात्रतेचे निकष बदलण्यात आले असल्याने याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेशावर होणार आहे. पीसीएम गटात ४५ टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांलाही अभियांत्रिकीकरिता प्रवेश दिला जात होता; मात्र राज्य शासनाने यात पुन्हा बदल करून जूनाच ५० टक्क्यांचा पात्रता निकष पुन्हा लागू केला आहे. परिणामी पूर्वीच रिक्त जागांची काळजी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांवर या निर्णयाने काळजीत अधिक भरच पडली आहे. याबाबत वृत्त असे की, बारावी विज्ञान शाखेतील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांकरिता तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी पात्रता निकष तयार केले आहे. यानुसार प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबत भौतिकशास्त्र, गणित अनिवार्य विषय व त्याबरोबर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, व्होकेशनल यापैकी एक विषय असे तीन विषयाचे एकत्रित गुण असे किमान ५० टक्के प्राप्त करणे अनिवार्य होते. मागासवर्गीय व अपंग उमेदवारांसाठी हाच निकष ४५ टक्के होता; मात्र गत काही वर्षांपासून अभियांत्रिकीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. प्रवेशासंबंधी अडचणींवर विचार करून पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी पीसीएम गटात ४५ टक्के गुणांवर अभियांत्रिकीत प्रवेश दिला जात होता. मागासवर्गीयांकरिता ही टक्केवारी ४० वर आली होती. यात पुन्हा ५ टक्क्याने वाढ केली असल्याने जूनाच निकष राज्यात लागू झाला आहे. या सत्रातील इयत्ता बारावी उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे. या टक्केवारीतील फरकाचा परिणाम रिक्त जागांवर होणार असल्याचे दिसून येते. कारण ४५ टक्के हा पात्रता निकष असतानाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त असायच्या. आता तर निकष वाढविल्याने विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांची पाठ अभियांत्रिकीकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ काही अंशी कमी झाला. महाविद्यालयातील रिक्त जागा हा त्याचाच दाखला आहे. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पूर्वी हमखास रोजगार मिळत होता; मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कमी झाला. शिवाय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने हा परिणाम जाणवतो.