शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

By admin | Updated: June 19, 2016 01:47 IST

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे.

विद्यार्थी १५ हजार ८३० : जागा २० हजार ८००, कॉलेजचीच धावाधावश्रेया केने  वर्धादहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे. अकरावीतील प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयापुढे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र याची गरज भासणार नाही. जिल्ह्यात १५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून अकरावीकरिता २० हजार ८०० जागा आहेत. त्यामुळे ५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांकरिता कॉलेजचीच धावाधाव होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात १३० कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून २०८ तुकड्या आहेत. ज्या महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात १०० तर ज्या महाविद्यालयात केवळ बाराव्या वर्गापर्यत शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात ६० प्रवेशाची मुभा आहे. यात प्रत्येक महाविद्यालय शिक्षण उपसंचालकांकडून २० जागा या वाढीव मागत असतात, यामुळे जिल्ह्याची प्रवेश क्षमता २० हजार ८०० पर्यंत आाहे. यातही नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांसह पालकही प्रयत्नरत असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून याचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. यातून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी जाहीर करून त्यानुसार प्रवेश दिल्या जातो. प्रवेशाकरिता महाविद्यालयांपुढे पालक व विद्यार्थ्यांच्या रांगा पाहायला मिळतात. दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यंदा मात्र हे चित्र पालटण्याचे चिन्ह आहे. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता अधिक आहे. त्यामुळे पाच हजार जागा रिक्त राहणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या रिक्त जागा भरण्याकरिता महाविद्यालयांचीच आता धावाधाव होणार असल्याची चिन्हे जिल्ह्यात दिसत आहेत. शाखानिहाय प्रवेश क्षमताकला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम अशा चार शाखांमिळून असलेल्या १३० महाविद्यालयात २० हजार ८०० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. यात अनुदानित व विनाअनुदानित अशा २०८ तुकड्या आहेत. कला शाखेत ९४ तुकड्या अनुदानित तर २० विना अनुदानित आहे. विज्ञान शाखेत २० अनुदानित तर ३८ विनाअनुदानित आहे. वाणिज्य शाखेत २० अनुदानित आणि १६ विना अनुदानित आहेत. अनुदानित आणि विना अनुदानित तुकड्यांची प्रवेश क्षमता पाहता २० हजार विद्याथी यात प्रवेशित होऊ शकतात; मात्र दहावी परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी संख्या १५ हजार ८०० आहेत. तंत्रनिकेतन, आयटीआयच्या जागा वेगळ्याच या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, आयटीआय येथे प्रवेश घेतात. तसेच काही विद्यार्थी जिल्ह्याबाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे ५ हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.