शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधि; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

By admin | Updated: June 19, 2016 01:47 IST

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे.

विद्यार्थी १५ हजार ८३० : जागा २० हजार ८००, कॉलेजचीच धावाधावश्रेया केने  वर्धादहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे. अकरावीतील प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयापुढे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र याची गरज भासणार नाही. जिल्ह्यात १५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून अकरावीकरिता २० हजार ८०० जागा आहेत. त्यामुळे ५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांकरिता कॉलेजचीच धावाधाव होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात १३० कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून २०८ तुकड्या आहेत. ज्या महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात १०० तर ज्या महाविद्यालयात केवळ बाराव्या वर्गापर्यत शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात ६० प्रवेशाची मुभा आहे. यात प्रत्येक महाविद्यालय शिक्षण उपसंचालकांकडून २० जागा या वाढीव मागत असतात, यामुळे जिल्ह्याची प्रवेश क्षमता २० हजार ८०० पर्यंत आाहे. यातही नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांसह पालकही प्रयत्नरत असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून याचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. यातून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी जाहीर करून त्यानुसार प्रवेश दिल्या जातो. प्रवेशाकरिता महाविद्यालयांपुढे पालक व विद्यार्थ्यांच्या रांगा पाहायला मिळतात. दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यंदा मात्र हे चित्र पालटण्याचे चिन्ह आहे. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता अधिक आहे. त्यामुळे पाच हजार जागा रिक्त राहणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या रिक्त जागा भरण्याकरिता महाविद्यालयांचीच आता धावाधाव होणार असल्याची चिन्हे जिल्ह्यात दिसत आहेत. शाखानिहाय प्रवेश क्षमताकला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम अशा चार शाखांमिळून असलेल्या १३० महाविद्यालयात २० हजार ८०० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. यात अनुदानित व विनाअनुदानित अशा २०८ तुकड्या आहेत. कला शाखेत ९४ तुकड्या अनुदानित तर २० विना अनुदानित आहे. विज्ञान शाखेत २० अनुदानित तर ३८ विनाअनुदानित आहे. वाणिज्य शाखेत २० अनुदानित आणि १६ विना अनुदानित आहेत. अनुदानित आणि विना अनुदानित तुकड्यांची प्रवेश क्षमता पाहता २० हजार विद्याथी यात प्रवेशित होऊ शकतात; मात्र दहावी परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी संख्या १५ हजार ८०० आहेत. तंत्रनिकेतन, आयटीआयच्या जागा वेगळ्याच या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, आयटीआय येथे प्रवेश घेतात. तसेच काही विद्यार्थी जिल्ह्याबाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे ५ हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.