शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

१५ दिवसांपासून वीज, पाणी बंद

By admin | Updated: July 9, 2015 02:11 IST

नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली.

वाघोलीच्या ग्रामस्थांची व्यथा : सार्वजनिक विहिरीत गाळच गाळ, पाणी आटलेआष्टी (शहीद) : नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली. विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या तारा दुरूस्त केल्या नाही. यामुळे विजेअभावी गावात काळोख पसरला आहे. गत १५ दिवसांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व वीज कंपनीचा निषेध नोंदविला. ग्रामस्थांनी रिक्त भांडे दाखवून निषेध नोंदविल्याने प्रशासनात खळबळ माजली.पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात मुबलक पाणीसाठा आहे. ग्रा.पं. च्या सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याचे झरे बंद झाले. या विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होतो. गाळ काढण्यासाठी ग्रामसेवकाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. या विहिरीवर जोडण्यात आलेला वीज पुरवठा बंद झाल्याची माहिती वीज कंपनीचे अंतोरा कार्यालयाचे अभियंता एम.एम. पेठे यांना दिली; पण पेठे यांनी दुरूस्त करण्याचे आश्वासन देऊन १४ दिवसांपासून वीज सुरू केली नाही. ग्रामस्थांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. आजपर्यंत वाघोली गावात अशा समस्या उद्भवल्या नाही; पण ग्रामसेवक पठाण यांच्या ढीसाळ कारभारामुळे ही स्थिती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरूद्ध देवानंद डमके, ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण अलोणे, पंकज लव्हाळे, अभिजीत खैरकार, रमेश ढवळे, श्रीधर वानखडे, सुरज लव्हाळे, प्रीतम सरोदे यांनी आरोग्यसेविका शारदा शिरसाट यांना गावात बोलवून पाण्याचे नमुने घेण्यास सांगितले. यात गाळ असल्यानेच दूषित पाणी असल्याचा अहवाल त्यांनी दिला. पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)संतप्त ग्रामस्थांकडून निषेध; ग्रामसेवकावर कारवाईची मागणीगत १५ दिवसांपासून वीज आणि पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रिक्त भांडे घेऊन निषेध नोंदविला. यावेळी दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. वीज व पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.वाघोली ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचारी केशव राऊत यांच्याकडे तक्रार केली असता तेही सतत दुर्लक्ष करीत आहेत. या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला. यावर पंचायत समिती प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उन्हाळ्यात गाळ काढला नाहीविहिरीमध्ये गाळ असल्याची माहिती ग्रा.प. सदस्यांनी सचिव पठाण यांना दिली होती. असे असताना गाळ काढण्यासाठी सुरूवात केली नाही. सरपंचांनी ग्रामसेवक पठाण यांची बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली; पण ग्रामसेवक पठाण यांनी अद्याप पदभार दिला नाही. यामुळे कामकाज चालविणे कठीण झाले आहे.हातपंपालाही अपुरे पाणीसार्वजनिक विहिरीमधील झरे बुजले व पाणी आटल्याने पाणी पुरवठा बंद झाला. यामुळे ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले; पण हातपंपालाही पुरेसे पाणी नसल्याने गोची झाली आहे. शिवाय गर्दी होत असल्याने महिलाही त्रस्त आहेत.ग्रामसेवक पठाण काम करीत नाही. यामुळे दुसरे ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंचांनी केली होती. १ जुलै रोजी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली आहे. पाणी पुरवठा बंद असल्याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल.- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (श.).विजेच्या तारा तुटलेल्याचवादळ व पावसामुळे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामसेवकाने वीज कंपनीकडे तक्रार केली नाही. अखेर ग्रामस्थांनी तक्रार केली. यावर वीज कंपनीचे अभियंता पेठे यांनी दुरूस्तीचे आश्वासन दिले होते; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ग्रामस्थ चकरा मारतात; पण वीज कंपनीचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने तेही हतबल झाले आहे.