शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांअभावी विद्युत कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी

अल्लीपूर : वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी अनेकांना वीज कापण्याची नामुष्की सहन करावी लागते. येथील ग्रामस्थांना तांत्रिक बिघाडामुळे अनेकद रात्र काळोखात घालवावी लागते. कार्यालयात तक्रार करण्यास गेले असता तेथे कर्मचारी राहत नसल्याने ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते.येथील कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी आणि कार्यालयात राहण्याचे वावडे असल्याने समस्या तशीच असते. वीज देयक देण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचा ताफा ग्राहकाकडे वसुलीकरिता धडकतो. मात्र तक्रार देण्याकरिता गेलेल्या ग्राहकाची तक्रार मात्र या तातडीने सोडविली जात नाही. तक्रारीचा निपटारा होत नसल्याने अखेर ग्रामस्थ स्वत:कडील पैसे खर्च करुन खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करुन घेतात. येथील कनिष्ठ अभियंता हे मुख्यालयी राहत नाही. केवळ साप्ताहिक बाजाराच्या दिवशी कार्यालयात हजर असतात. येथील वीज वितरणचे कार्यालय काही अंतरावर असल्याने ग्राहकांकरिता ते गैरसोयीचे ठरते. येथे समस्यांचा डोंगर असल्याने ग्राहकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. भारनियमनाने शेतकरी, गावातील लघु उद्योजक त्रस्त झाले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा आठ दिवसांपर्यंत वीजपुरवठा बंद असतो. मोठ्या लाईनवरुन बिघाड असल्याची सबब पुढे करीत येथील कर्मचारी वेळकाढूपणा करतात. याची दखल घेत कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी आहे.(वार्ताहर) अनियमित भारनियमनाने पिके करपलीसेलू- तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) आणि परिसरात अनियमित भारनियमन सुरु आहे. यामुळे परिसरातील ओलिताची कामे रखडली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तीव्र उन्हामुळे पऱ्हाटीचे पीक सुकले असून पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र यात भारनियमनाची शेतकऱ्यांना आडकाठी येत आहे. कृषीपंपाचे देयक नियमित भरत असतानाही या भागातील शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. येथील शेतकरी मंडळाने भारनियमन कमी करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळाने वर्धा कार्यालयात निवेदन सादर दिले असून भारनियमन कमी करण्याची मागणी आहे. यावेळी अभियंता धवड यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी अपूरा कोळसा, अपुरा पाऊस यासह आदी अडचणीमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगितले. रात्रीची वीज न देता कृषीपंपासाठी दिवसा वीज दिली जात असल्याची माहिती दिली. भारनियमन बंद करावे, २४ तास विद्युत पुरवठा ठेवावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)