शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांअभावी विद्युत कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी

अल्लीपूर : वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी अनेकांना वीज कापण्याची नामुष्की सहन करावी लागते. येथील ग्रामस्थांना तांत्रिक बिघाडामुळे अनेकद रात्र काळोखात घालवावी लागते. कार्यालयात तक्रार करण्यास गेले असता तेथे कर्मचारी राहत नसल्याने ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते.येथील कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी आणि कार्यालयात राहण्याचे वावडे असल्याने समस्या तशीच असते. वीज देयक देण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचा ताफा ग्राहकाकडे वसुलीकरिता धडकतो. मात्र तक्रार देण्याकरिता गेलेल्या ग्राहकाची तक्रार मात्र या तातडीने सोडविली जात नाही. तक्रारीचा निपटारा होत नसल्याने अखेर ग्रामस्थ स्वत:कडील पैसे खर्च करुन खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करुन घेतात. येथील कनिष्ठ अभियंता हे मुख्यालयी राहत नाही. केवळ साप्ताहिक बाजाराच्या दिवशी कार्यालयात हजर असतात. येथील वीज वितरणचे कार्यालय काही अंतरावर असल्याने ग्राहकांकरिता ते गैरसोयीचे ठरते. येथे समस्यांचा डोंगर असल्याने ग्राहकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. भारनियमनाने शेतकरी, गावातील लघु उद्योजक त्रस्त झाले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा आठ दिवसांपर्यंत वीजपुरवठा बंद असतो. मोठ्या लाईनवरुन बिघाड असल्याची सबब पुढे करीत येथील कर्मचारी वेळकाढूपणा करतात. याची दखल घेत कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी आहे.(वार्ताहर) अनियमित भारनियमनाने पिके करपलीसेलू- तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) आणि परिसरात अनियमित भारनियमन सुरु आहे. यामुळे परिसरातील ओलिताची कामे रखडली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तीव्र उन्हामुळे पऱ्हाटीचे पीक सुकले असून पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र यात भारनियमनाची शेतकऱ्यांना आडकाठी येत आहे. कृषीपंपाचे देयक नियमित भरत असतानाही या भागातील शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. येथील शेतकरी मंडळाने भारनियमन कमी करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळाने वर्धा कार्यालयात निवेदन सादर दिले असून भारनियमन कमी करण्याची मागणी आहे. यावेळी अभियंता धवड यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी अपूरा कोळसा, अपुरा पाऊस यासह आदी अडचणीमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगितले. रात्रीची वीज न देता कृषीपंपासाठी दिवसा वीज दिली जात असल्याची माहिती दिली. भारनियमन बंद करावे, २४ तास विद्युत पुरवठा ठेवावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)