शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

कर्मचाऱ्यांअभावी विद्युत कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी

अल्लीपूर : वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी अनेकांना वीज कापण्याची नामुष्की सहन करावी लागते. येथील ग्रामस्थांना तांत्रिक बिघाडामुळे अनेकद रात्र काळोखात घालवावी लागते. कार्यालयात तक्रार करण्यास गेले असता तेथे कर्मचारी राहत नसल्याने ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते.येथील कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी आणि कार्यालयात राहण्याचे वावडे असल्याने समस्या तशीच असते. वीज देयक देण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचा ताफा ग्राहकाकडे वसुलीकरिता धडकतो. मात्र तक्रार देण्याकरिता गेलेल्या ग्राहकाची तक्रार मात्र या तातडीने सोडविली जात नाही. तक्रारीचा निपटारा होत नसल्याने अखेर ग्रामस्थ स्वत:कडील पैसे खर्च करुन खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करुन घेतात. येथील कनिष्ठ अभियंता हे मुख्यालयी राहत नाही. केवळ साप्ताहिक बाजाराच्या दिवशी कार्यालयात हजर असतात. येथील वीज वितरणचे कार्यालय काही अंतरावर असल्याने ग्राहकांकरिता ते गैरसोयीचे ठरते. येथे समस्यांचा डोंगर असल्याने ग्राहकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. भारनियमनाने शेतकरी, गावातील लघु उद्योजक त्रस्त झाले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा आठ दिवसांपर्यंत वीजपुरवठा बंद असतो. मोठ्या लाईनवरुन बिघाड असल्याची सबब पुढे करीत येथील कर्मचारी वेळकाढूपणा करतात. याची दखल घेत कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी आहे.(वार्ताहर) अनियमित भारनियमनाने पिके करपलीसेलू- तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) आणि परिसरात अनियमित भारनियमन सुरु आहे. यामुळे परिसरातील ओलिताची कामे रखडली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तीव्र उन्हामुळे पऱ्हाटीचे पीक सुकले असून पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र यात भारनियमनाची शेतकऱ्यांना आडकाठी येत आहे. कृषीपंपाचे देयक नियमित भरत असतानाही या भागातील शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. येथील शेतकरी मंडळाने भारनियमन कमी करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळाने वर्धा कार्यालयात निवेदन सादर दिले असून भारनियमन कमी करण्याची मागणी आहे. यावेळी अभियंता धवड यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी अपूरा कोळसा, अपुरा पाऊस यासह आदी अडचणीमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगितले. रात्रीची वीज न देता कृषीपंपासाठी दिवसा वीज दिली जात असल्याची माहिती दिली. भारनियमन बंद करावे, २४ तास विद्युत पुरवठा ठेवावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)