शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:37 IST

लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण गुरुवारी पार पडला. यादरम्यान अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला.

ठळक मुद्देपंखे, दिवे सुरूच; अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण गुरुवारी पार पडला. यादरम्यान अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, विद्युत दिवे सुरूच होते, तर पंखे रित्या खुर्च्यांना हवा देत असल्याचे चित्र कार्यालयीन वेळ असलेल्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाहायला मिळाले.वर्धा लोकसभेकरिता गुरुवारी जिल्ह्यात मतदान घेण्यात आले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण जिल्हा प्रशासन निवडणूक कामात होते. निवडणूक प्रक्रियेला अंतिम स्वरूप देईपर्यंत सर्वच नाही, मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामकाज करावे लागले. निवडणुकीच्या एक आठवड्यापासूनच निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चक्क पहाटेपर्यंत काम करावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून कर्मचारी, शिपायापर्यंत निवडणुकीकरिता ड्युटी लागली होती. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत सर्वच विभागातील कर्मचारी फायलींच्या ढिगांनी वेढलेले दिसून आले. विविध विभागांतील कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, बुधवारी सकाळी नियोजित मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ असे ११ तास डोळ्यात तेल घालून मतदान प्रक्रिया पार पाडावी लागली. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर रात्री उशिरा कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन जिल्हास्थळी पोहोचले.शुक्रवारी लोकमत चमूने जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील इतर कार्यालयाचा फेरफटका मारला असता जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागांत प्रचंड शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन विभागात दुपारी १२.३० वाजले तरी कुणी अधिकारी, कर्मचारी आले नव्हते. मात्र, जमीन शाखेतील पंखे आणि दिवे सुरूच होते.खुर्च्यांना अधिकाऱ्यांची प्रतीक्षा होती, असे परिस्थितीवरून दिसून आले. विजेची अशी उधळपट्टी होत असताना कुणाचेही याकडे लक्ष नव्हते. तालुकास्तरावरून आलेल्या कित्येक नागरिकांना कामाविनाच आल्यापावली परतावे लागले. याविषयी विचारणा केली असता ‘निवडणूक काम झाल्याने आले नसतील’, असे उत्तर मिळाले.विभागप्रमुखही गायब!जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कुठलीही सुटी घोषित केली नसताना शहरातील इतर शासकीय कार्यालयांतील विभागातही अनेक कक्ष निर्मनुष्य होते. अधिकारी कर्मचारी रितसर सुटीवर आहे की नाही, याविषयी संबंधित विभागप्रमुखही अनुपस्थित असल्याने कळू शकले नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीelectricityवीज