शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:26 IST

विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : कृषी उर्जीकरणासाठी १०६ कोटी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. याचाच परिपाक म्हणून एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली. यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.तीन वर्षापूर्वी दुष्काळी विदर्भ आणि मराठवाड्यात कृषीपंपांना वीज जोडणी लवकर दिली जात नव्हती. कारण कृषीपंपांना वीज देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधाच येथे निर्माण करण्यात आल्या नव्हत्या. त्याचा फटका सिंचनाची सुविधा असतानाही केवळ वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकºयांना बसत होता. यामुळे शेतकºयांनी स्वत: सिंचन सुविधा निर्माण करूनही शेतकºयांच्या परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नव्हता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर या विषयाकडे गांभिर्याने लक्ष दिले. त्यासाठी २०१५ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खास २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज घोषित केले. यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करुन देत शेतकºयांची महत्वाची समस्या निकाली निघाली.जिल्ह्यात मार्च २०१५ अखेर पर्यंत ४ हजार ४७१ जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी २ हजार ५०३ जोडण्या कृषीपंपांना देण्यात आल्यात. २०१६ मध्ये कृषीपंपाच्या उर्जिकरणासाठी ३१.०६ कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेल्या १ हजार ९६८ आणि डिसेंबर २०१५ पर्यंत प्राप्त झालेल्या अशा ४ हजार८५० जोडण्या देण्यात आल्या. यातही मार्च २०१६ अखेर पर्यंत प्रलंबीत असलेल्या ३ हजार ६७२ जोडण्या आणि यंदा प्राप्त झालेले अर्ज याला न्याय देण्यासाठी शासनाने ७५ कोटी रूपये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत ४हजार ६०९ वीज जोडण्या देता आल्या. मार्च २०१७ अखेर २३०० जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी आॅगस्ट २०१७ पर्यंत १ हजार ६३० जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित ६७० जोडण्या आणि नवीन ११०० जोडण्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे महावितरणचे अधीक्षक एस.टी. देशपांडे यांनी सांगितले.सिंचन करणे झाले सोपेमागील दहा वर्षांत केवळ ५ हजार वीज जोडण्या दिल्या होत्या. तर या तीन वर्षांत १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडण्या देऊन शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे पिकांना सिंचन करणे सहजशक्य होत असल्याचे शेतकरी सांगतात.