शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:26 IST

विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : कृषी उर्जीकरणासाठी १०६ कोटी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. याचाच परिपाक म्हणून एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली. यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.तीन वर्षापूर्वी दुष्काळी विदर्भ आणि मराठवाड्यात कृषीपंपांना वीज जोडणी लवकर दिली जात नव्हती. कारण कृषीपंपांना वीज देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधाच येथे निर्माण करण्यात आल्या नव्हत्या. त्याचा फटका सिंचनाची सुविधा असतानाही केवळ वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकºयांना बसत होता. यामुळे शेतकºयांनी स्वत: सिंचन सुविधा निर्माण करूनही शेतकºयांच्या परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नव्हता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर या विषयाकडे गांभिर्याने लक्ष दिले. त्यासाठी २०१५ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खास २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज घोषित केले. यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करुन देत शेतकºयांची महत्वाची समस्या निकाली निघाली.जिल्ह्यात मार्च २०१५ अखेर पर्यंत ४ हजार ४७१ जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी २ हजार ५०३ जोडण्या कृषीपंपांना देण्यात आल्यात. २०१६ मध्ये कृषीपंपाच्या उर्जिकरणासाठी ३१.०६ कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेल्या १ हजार ९६८ आणि डिसेंबर २०१५ पर्यंत प्राप्त झालेल्या अशा ४ हजार८५० जोडण्या देण्यात आल्या. यातही मार्च २०१६ अखेर पर्यंत प्रलंबीत असलेल्या ३ हजार ६७२ जोडण्या आणि यंदा प्राप्त झालेले अर्ज याला न्याय देण्यासाठी शासनाने ७५ कोटी रूपये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत ४हजार ६०९ वीज जोडण्या देता आल्या. मार्च २०१७ अखेर २३०० जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी आॅगस्ट २०१७ पर्यंत १ हजार ६३० जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित ६७० जोडण्या आणि नवीन ११०० जोडण्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे महावितरणचे अधीक्षक एस.टी. देशपांडे यांनी सांगितले.सिंचन करणे झाले सोपेमागील दहा वर्षांत केवळ ५ हजार वीज जोडण्या दिल्या होत्या. तर या तीन वर्षांत १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडण्या देऊन शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे पिकांना सिंचन करणे सहजशक्य होत असल्याचे शेतकरी सांगतात.