शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

६ हजार तरुणांनी साकारले निवडणूक आयोगाचे चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहाच्या वातावरणात शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल ...

ठळक मुद्दे९ वा राष्ट्रीय मतदार दिन : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहाच्या वातावरणात शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे ६ हजार तरुणांनी भारत निवडणूक आयोगाच्या चिन्हाची मानवी प्रतिकृती साकार करून कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता  येणाºया सर्व निवडणुकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. तसेच ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ग्राऊंड येथे ७० हजार चौरस फूट जागेवर रांगोळी काढून मतदानाविषयी जनजागृती केली.जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रमण आटर्स आणि महाविद्यालयीन मतदार जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे  आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम नवं मतदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. किरण धांदे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील नवीन मतदारांच्या सहकार्याने ६ हजार तरुण आणि तरुणींच्या मदतीने मानवी रांगोळी साकारण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांना यावेळी मतदार दिनाची शपथ दिली. उपस्थित तरुणांमधून एक विद्यार्थी व विद्यार्थिनीला मंचावर बोलावून त्यांना ई व्ही एम वर मतदान करण्याचे प्रात्याक्षिक करून घेतले. यावेळी या नव  मतदारांनी व्ही व्ही पॅट च्या माध्यमातून केलेले मतदान योग्य व्यक्तीला मिळाले की नाही याची खात्री  सुद्धा करून घेतली. वर्धेतील दैवत बँड पथकाने केलेल्या अतिशय दमदार सादरीकरणाने  या सर्व कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुटीचा सुशिक्षित नागरिक मतदान न करता कसा उपयोग करतात याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी नृत्य आणि पथनाटयाच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली. यावेळी आयोजित निबंध, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आणि प्राचार्यांना   मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन आणि लोकशाही पंधरवाडा निमित्त पोलीस ग्राऊंडवर ७० हजार चौरस फूट जागेवर रांगोळी तयार करून मतदानाचा संदेश देण्यात आला. यासाठी रमण आटर्सच्या १५० विद्यार्थ्यांनी १४ तास रांगोळी काढली.

टॅग्स :Electionनिवडणूक