शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

By admin | Updated: June 30, 2016 02:10 IST

सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती;

परंपरा अबाधित : तडजोडीत देशमुख १३ आणि गोडे गट ८ जागांवर समाधानीवर्धा : सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती; मात्र माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार व प्रतिस्पर्धी डॉ. शिरीष गोडे यांच्या परिवर्तन गटात अखेरच्या क्षणी तडजोड झाल्याने निवडणूक अविरोध झाली. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाच्या वाट्याला आठ सदस्य देण्याचा निर्णय झाला. यामुळे उर्वरित उमेदवारांचे नामांकन परत घेण्यात आले. सहकार गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील सुरेश देशमुख, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शफात अली, शरद पावडे, सुनील भोगे, पांडुरंग उजवणे, नरेंद्र थोरात, घनश्याम डाखोळे हे उमेदवार अविरोध ठरलेत. तर महिला प्रवर्गात शोभा काळे अविरोध आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून रमेशचंद्र राठी, ज्ञानेश्वर झलके, इतर मागासवर्ग प्रवर्गातून संदीप देशमुख व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून अशोक महाजन हे उमेदवार अविरोध ठरले आहेत. परिवर्तन गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील डॉ. शिरीष गोडे, प्रदीप धांदे, भैय्यासाहेब हिवंज, सुभाष कडू, प्रमोद हांडे, तर महिला प्रवर्गातून किरण महल्ले या उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून मदन भोगे हे अविरोध ठरले आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून राजेंद्र कांबळे यांची अविरोध निवड झाली आहे.१९९४ पासून सुतगिरणीला अविरोध निवडणुकीची परंपरा लाभली आहे. यावेळी मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची अपेक्षा मतदारांनी वर्तविली होती. सहकार आणि परिवर्तन गटातर्फे उमेदवारांचे नामांकन अर्जही दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे ९ हजार ८०० मतदारसंख्या असलेल्या या सुतगिरणीची निवडणूक होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र नामांकन अर्ज परत घेईपर्यंत समेट घडून आणण्यात दोन्ही गट प्रमुखांना यश आल्याने ही निवडणूक टळली. दोन्ही गटातील या तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाला ८ जागा देण्याचा निर्णय झाला. निवडणुकीत कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे १० जुलैला होऊ घातलेली निवडणूक आता होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)६२ पैकी ४१ जणांचे नामांकन परतबापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीच्या या निवडणुकीत यंदा दोन गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटातून एकूण ६२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नामांकन परत घेण्याचा बुधवार अंतिम दिवस असल्याने ४१ जणांनी अर्ज परत घेतले. यामुळे उर्वरीत नामांकनात १३ देशमुख व आठ गोडे गटाचे सदस्य राहिल्याने ते अविरोध ठरले. एकाचवेळी ४१ नामांकन परत घेण्यात आल्यामुळे या निवडणुकीची अपेक्षित चुरस येथेच संपली. बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अनेकांनी अर्ज परत घेतल्याने अविरोध ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नामांकन परत घेण्याचा आज अंतिम दिवस होता. अविरोध निवडणुकीची घोषणा गुरुवारी होईल.- जे. एम. तलमले, निवडणूक अधिकारी, तथा सहा. उपनिबंधक, वर्धा