शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

By admin | Updated: June 30, 2016 02:10 IST

सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती;

परंपरा अबाधित : तडजोडीत देशमुख १३ आणि गोडे गट ८ जागांवर समाधानीवर्धा : सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती; मात्र माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार व प्रतिस्पर्धी डॉ. शिरीष गोडे यांच्या परिवर्तन गटात अखेरच्या क्षणी तडजोड झाल्याने निवडणूक अविरोध झाली. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाच्या वाट्याला आठ सदस्य देण्याचा निर्णय झाला. यामुळे उर्वरित उमेदवारांचे नामांकन परत घेण्यात आले. सहकार गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील सुरेश देशमुख, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शफात अली, शरद पावडे, सुनील भोगे, पांडुरंग उजवणे, नरेंद्र थोरात, घनश्याम डाखोळे हे उमेदवार अविरोध ठरलेत. तर महिला प्रवर्गात शोभा काळे अविरोध आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून रमेशचंद्र राठी, ज्ञानेश्वर झलके, इतर मागासवर्ग प्रवर्गातून संदीप देशमुख व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून अशोक महाजन हे उमेदवार अविरोध ठरले आहेत. परिवर्तन गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील डॉ. शिरीष गोडे, प्रदीप धांदे, भैय्यासाहेब हिवंज, सुभाष कडू, प्रमोद हांडे, तर महिला प्रवर्गातून किरण महल्ले या उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून मदन भोगे हे अविरोध ठरले आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून राजेंद्र कांबळे यांची अविरोध निवड झाली आहे.१९९४ पासून सुतगिरणीला अविरोध निवडणुकीची परंपरा लाभली आहे. यावेळी मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची अपेक्षा मतदारांनी वर्तविली होती. सहकार आणि परिवर्तन गटातर्फे उमेदवारांचे नामांकन अर्जही दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे ९ हजार ८०० मतदारसंख्या असलेल्या या सुतगिरणीची निवडणूक होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र नामांकन अर्ज परत घेईपर्यंत समेट घडून आणण्यात दोन्ही गट प्रमुखांना यश आल्याने ही निवडणूक टळली. दोन्ही गटातील या तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाला ८ जागा देण्याचा निर्णय झाला. निवडणुकीत कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे १० जुलैला होऊ घातलेली निवडणूक आता होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)६२ पैकी ४१ जणांचे नामांकन परतबापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीच्या या निवडणुकीत यंदा दोन गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटातून एकूण ६२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नामांकन परत घेण्याचा बुधवार अंतिम दिवस असल्याने ४१ जणांनी अर्ज परत घेतले. यामुळे उर्वरीत नामांकनात १३ देशमुख व आठ गोडे गटाचे सदस्य राहिल्याने ते अविरोध ठरले. एकाचवेळी ४१ नामांकन परत घेण्यात आल्यामुळे या निवडणुकीची अपेक्षित चुरस येथेच संपली. बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अनेकांनी अर्ज परत घेतल्याने अविरोध ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नामांकन परत घेण्याचा आज अंतिम दिवस होता. अविरोध निवडणुकीची घोषणा गुरुवारी होईल.- जे. एम. तलमले, निवडणूक अधिकारी, तथा सहा. उपनिबंधक, वर्धा