शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

आठव्या वर्गाच्या अफवेने पालक त्रस्त

By admin | Updated: May 6, 2015 00:04 IST

जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग निर्माण होणार असल्याच्या अफवेने जिल्ह्यात चांगलाच उधम घातला आहे.

काही ठिकाणाहून वाढीव वर्गांचा प्रस्ताव : अनेक शाळेतून दाखला देण्यास नकार वर्धा : जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग निर्माण होणार असल्याच्या अफवेने जिल्ह्यात चांगलाच उधम घातला आहे. यामुळे काही शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतून सातव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना दाखला देण्यास नकार देणे सुरू केले आहे. यामुळे पाल्याच्या प्रवेशाकरिता पालकांसमोर चिंता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जि.प.च्या उच्च प्राथमिक शाळा आहेत. यात सातव्या वर्गापर्यंत शिक्षण दिले जात आहे. आता त्या शाळेत आठवा वर्ग येणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. वास्तविकतेत ज्या भागात आठवा वर्ग असलेली शाळा तीन किमी अंतरात आहे, त्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवा वर्ग निर्माण करणे शक्य नसल्याचे शिक्षण कायदा सांगत आहे. ज्या भागात अशा शाळा नाही त्या भागात आठवा वर्ग सुरू होणार असा प्रस्ताव जिल्हा परिषदेत तयार झाला नाही, अथवा तशा शासनाच्या कुठल्या सूचनाही नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेच्या असलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा टिकविण्याची समस्या त्यांच्यासमोर आली आहे, अशात पुन्हा त्या वर्ग वाढ करण्याची तयारी सध्यातरी जिल्हा परिषदेची नसल्याची माहिती आहे. असे असताना जिल्ह्यात पसरत असलेली ही अफवा शिक्षण विभागाकरिता चिंतेचा विषय ठरत आहे. याचा त्रास पालकांना सहन करावा लागत आहे. त्यांना मुलांचे दाखले मिळण्यास अडचण होत आहे. याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी) काही शाळा व्यवस्थापन समितीने दाखल केले प्रस्ताव जिल्ह्यातील काही शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यांच्या भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत सातव्या वर्गानंतर आठवा वर्ग देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर केला आहे. त्या भागात तीन किमी अंतराच्या नियमात शाळा असल्याने आठवा वर्ग देण्यात येणे शक्य नसल्याचे या समितींना शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती आहे. दाखल्यांकरिता पालकांची अडवणूक जिल्ह्यात असलेल्या काही उच्च प्राथमिक शाळेतून पालकांना मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे मुलांना आठवीत प्रवेश देण्याकरिता त्यांना अडचणीचे ठरत आहे. सातवा वर्ग सोडल्याचा दाखला मिळाल्यास मुलाला गावातील वा शहरातील शाळेत प्रवेश देणे सोपे जाईल अशा प्रतिक्रीया पालकांकडून मिळत आहे. मात्र जि.प.च्या शाळेतील या शिक्षकांकडून अडवणूक होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत आठवा वर्ग देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाही वा तशा अद्याप शासनाच्या सूचना नाही. काही शाळा व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव आहे. असे असले तरी त्या भागात तीन किमी अंतरात दुसरी शाळा असल्यास तेथे परवानगी देणे शक्य नाही. - रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जि.प. वधा