शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

आठही पंचायत समितीच्या शिलेदारांची होणार निवड

By admin | Updated: March 13, 2017 00:40 IST

पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर यात बहुतांश ठिकाणी भाजपाची सरशी असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

मंगळवारी निवडणूक : शिमग्यानंतर गुलालाची उधळण वर्धा : पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर यात बहुतांश ठिकाणी भाजपाची सरशी असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. असे असतानाही भापजाच्यावतीने आठही पंचायत समितीत आपलाच सभापती बसावा याकरिता प्रयत्न सुरू आहेत. आठही पंचायत समितीची निवडणूक मंगळवारी होणार आहे. यामुळे कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडते व शिमग्यानंतर कोणाला गुलाल लागतो याकडे अनेकांच्या नजरा आहे. वर्धा, देवळी, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे), समुद्रपूर व हिंगणघाट या आठही पंचायत समितीची निवडणूक शिमग्यानंतर होणार आहे. यामुळे होळीच्या पूर्वीपासूनच विविध पक्षाच्यावतीने सत्तेकरिता आकडेमोड करणे सुरू केले आहे. यात सत्तेकरिता आवश्यक जादुई आकडा जमविण्याकरिता युती, आघाडी व गठबंधनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या पंचायत समितीत हा आकडा जुळला आहे तेथील गटनेता काही सदस्यांना घेवून सहलीवर गेल्याची चर्चा आहे. हे सदस्य निवडणुकीच्या काही काळापूर्वीच वर्धेत दाखल होणार आहे. यामुळे जुळलेले गणित वेळेवर बिघडणार नाही, याची दक्षात घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर, कारंजा (घाडगे), आर्वी, देवळी, आष्टी (शहीद), हिंगणघाट व वर्धा पंचायत समितीत भाजपाला बहुमत असल्याने येथे त्यांची सत्ता येणे आहे. तर सेलू येथे भाजपा आणि काँग्रेसकडे समान संख्याबळ असल्याने येथे कोणाची सत्ता बसते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येथील पंचायत समितीचा सभापती इश्वर चिठ्ठीने निवड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) सेलूत ईश्वर चिठ्ठीचा आधार येथील पंचायत समितीच्या १२ जागांपैकी काँग्रेस व भाजपाने प्रत्येकी सहा जागा जिंकल्या. त्यामुळे सेलू पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीमुळे येथे चमत्कार होवू शकते, अशी चर्चा आहे. सेलू पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (ओबीसी महिला) साठी राखीव आहे. काँग्रेसच्या शेंडे-जयस्वाल गटात निवडणुकीपूर्वीच समझोता होवून मैत्रीपूर्ण जागा वाटप करून घेतल्या. यामुळे मतभेद झाले नाही. काँग्रेसकडून नलूबाई मारोतराव बेले (सुकळी स्टे. गण), सुनीता दीपक अडसड (आमगाव (म.) गण) प्रणिता प्रदीप भुसारी (वघाळा गण) या तीन महिला पैकी एकीच्या गळ्यात तर भाजपाकडून ज्योती खोडे (केळझर गण) या एकमेव उमेदवार असल्याने यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडू शकते.