शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आठ महिन्यांपासून शिक्षक वेतनापासून वंचित

By admin | Updated: March 14, 2015 02:02 IST

सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही.

कारंजा (घा़) : सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही. महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन मिळावे, असा दंडक असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष व अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप होत आहे़ यामुळे दैनंदिन व्यवहार व उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे़सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या दोन संचालक गटात अनेक वर्षांपासून अनेक भांडणे सुरू आहेत. काही दावे कोर्टात सुरू आहेत़ एका गटाच्या आहारी जाऊन शिक्षणाधिकारी (माध्य़) जि.प. वर्धा यांनी याच संस्थेच्या सावळी शाळेतून घसाड यांची नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथे ज्येष्ठता क्रम डावलून नियमबाह्य मुख्याध्यापक पदी बदली केली. मान्यताही प्रदान केली; पण या आदेशावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. यानंतर आदेशाला स्थगिती देण्यात आली, तेव्हापासून या शाळेला अधिकृत मुख्याध्यापक नाही. यामुळे पवित्र शिक्षण कार्य करणाऱ्या शिक्षकांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन मिळाले नाही.शिक्षण विभागाने वेतन बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसणाऱ्या मुख्याध्यापकांच्या (घसाड) स्वाक्षरीने हायस्कूलच्या शिक्षकांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे वेतन बिले स्वीकारली व मंजूर केली; पण त्याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची वेतन बिले मात्र स्वीकारली नाही़ यामुळे ते वेतनापासून अद्याप वंचित आहे. मुख्यमंत्री व शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शेड्युल वनप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)संस्थेतील सेवाज्येष्ठता यादीतील सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अशा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना आहे; पण शिक्षणाधिकारी समस्या सरळमार्गी निकाली काढण्यास तयार नसल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण झाला़ यामुळे शिक्षक न्यायासाठी आंदोलन करण्याचा तयारीत आहेत़