शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शिक्षण प्रणालीत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:45 IST

पर्यावरणाची कुठलीही हाणी न होऊ देता घराचे बांधकाम होणे ही काळाची गरज आहे. आपण स्वत: अभियंता असून शिक्षण घेताना आम्हालाही सिमेंट काँक्रीट आदी विषयी माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देराजेंद्र देसाई : जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालत संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पर्यावरणाची कुठलीही हाणी न होऊ देता घराचे बांधकाम होणे ही काळाची गरज आहे. आपण स्वत: अभियंता असून शिक्षण घेताना आम्हालाही सिमेंट काँक्रीट आदी विषयी माहिती देण्यात आली. परंतु, सध्या काळाची व निसर्गाचा होणारा ऱ्हास लक्षात घेवून या शिक्षण प्रणालीत बदल होणे गरजेचे आहे. भारत आणि इंडिया यात मोठा फरक असून भारतात निसर्गपूरक शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे. पक्के सिमेंट काँक्रीटची मकान आकर्षक दिसत असली तरी तीन भुकंप व भविष्यातील १५ ते २० वर्षानंतर घातक आहेत, असे प्रतिपादन गाढे अभ्यासक राजेंद्र देसाई यांनी केले.स्थानिक जे. बी. विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात जमनालाल बजाज पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा विविध विषयांवर विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर शिक्षा मंडळाचे संजय भार्गव, प्रसन्ना भंडारी, डॉ. क्लेबर कारसन, रुपल देसाई, धुमसिंग नेगी आदींची उपस्थिती होती.धुमसिंग नेगी यांनी शेतकरी परिवारातून आपण आहे. खासगी शाळेसाठी प्रयत्न झाल्यानंतर आपण त्याच शाळेत दहा वर्ष सेवा दिली. शिवाय विविध प्रयोग केले. त्याच वेळी वृक्ष कत्तल विरोधी हुंकार भरला जात होता. सर्वोदय कार्यकर्त्यांनी अहिंसक पद्धतीने वृक्ष वाचविण्यासाठी लढा दिला. त्यावेळी झाडांना आंदोलनकर्त्यांनी भाऊ अशी संबोधत त्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक वृक्ष जगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.शेती विषयी बोलताना नेगी म्हणाले, सध्या शेती विषारी झाली आहे. विषमुक्त शेती होणे गरजेचे आहे. बीज बचाव आंदोलनासह शेती बचाव आंदोलन उभे होत आहे. विद्युत निर्मितीसाठी होणारे मोठाले बांध न बांधता छोटे-छोटे बांध बांधल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होतील. इतकेच नव्हे तर जंगल आणि जमिनीचे नुकसान जास्त होणार नाही. तसे पाहिजे तर छोटे बांधही काही प्रमाणात नुकसानदायक ठरणारेच असल्याचे यावेळी नेगी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला वर्धेतील गणमान्य व्यक्तींसह वर्धेकरांची उपस्थिती होती. याप्रसंगी छोट्या चित्रफितद्वारे विविध विषयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.