शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण; गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:22 IST

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे.

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. असे असतानादेखील बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शिक्षण हाच गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.घांगळे सभागृहात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे आयोजित सातव्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीरंग मेंढे होते. मीरा इंगोले, अरूणकुमार हर्षबोधी, वामन सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानातील शिक्षण व आजची आव्हाने या विषयावर बोलताना प्रा.घोडेस्वार म्हणाले, शिक्षणाला खासगीकरणाच्या विळख्यात ढकलून १३ पॉइंट आरक्षणासारखे निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी अर्ज करण्याची पात्रता, पण नोकरी मिळणार नाही, अशी प्रस्थापित व्यवस्था परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.प्रा.श्रीरंग मेंढे यांनी शिक्षणाच्या वर्तमान व्यवस्थेवर टीका केली. सचिन धोंगडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रास्ताविक अरविंद माणिककुळे यांनी केले. विषयाची भूमिका डॉ. राजू कांबळे यांनी मांडली. संचालन सावित्रीबाई नाखले यांनी तर आभार भाग्यश्री भगत यांनी मानले. आयोजनासाठी प्रकाश कांबळे, किशोर ढाले, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, परमा तायडे, मिलिंद नगराळे, विजय भालेराव इत्यादींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती