शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

माध्यमिकच्या ४४ प्रकरणांवर शिक्षण आयुक्तांचा आक्षेप

By admin | Updated: February 16, 2016 03:33 IST

माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेकरिता वर्धेत झालेल्या शिबिरातून एकूण ५२ शिक्षकांना वैयक्तिक मान्यता

वर्धा : माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेकरिता वर्धेत झालेल्या शिबिरातून एकूण ५२ शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली. यापैकी ४४ प्रकरणांवर शिक्षण आयुक्तांनी आक्षेप घेतला आहे. या मान्यतेमुळे शासनाच्या तिजोरीवर १ कोटी ९५ लाख रुपयांचा भुर्दंड बसत असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेल्या या वैयक्तिक मान्यतेमुळे येथे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेत झालेल्या शिबिरातून वैयक्तिक मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. असे असताना येथे शिक्षण आयुक्त कार्यालयाने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे नोटीस पाठविला. यात आपला कुठलाही संबंध नाही, असे म्हणत त्यांनी आलेला नोटीस पत्रासह परत पाठविला. यामुळे या प्रकरणांच्या चौकशीवरच प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा उल्लेख आहे. असेच पत्र येथे कार्यरत असलेल्या सोमकुवर यांना आले असून त्यांना उपशिक्षणाधिकारी या नावाने ते मिळाले आहे.राज्यात राज्यात आॅक्टोबर २०११ या काळात विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवी कर्मचारी भरती करण्यात येणार नाही असे आदेश होते. असे असताना अनेक शिक्षण संस्थांकडून कर्मचारी शिक्षक भरती होत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिक्षकांनी रिक्त पदे भरण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले. ही भरती निर्देशातील अटींच्या अधीन राहून करावायाची होती. असे असताना या नियमांना डावलून अनियमित रित्या मान्यता देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. शासनाच्या तिजोरीवर १.९५ कोटींचा भुर्दंड ४शासनाचे निर्देश झुगारात वर्धेत एकूण ४४ प्रकरणांना मान्यता देण्यात आल्याचा ठपका शिक्षण आयुक्तांनी ठेवला आहे. या प्रकरणात अनियमितता आढळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मान्यतेमुळे शासनाच्या तिजोरीवर १ कोटी ९५ लाख रुपयांचा भुर्दंड पडत आहे. ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस परत पाठविला ४वैयक्तीक मान्यता देण्याचे अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत. असे असताना वर्धा जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकाऱ्यांना ते पत्र आले. यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यात कुठलाही संबंध नसताना कोणीतरी आपल्या या प्रकारात गोवत असल्याचा आरोप करीत त्यांनी सदर नोटीस आयुक्तालयात परत पाठविला आहे. यामुळे या प्रस्तावावर होणाऱ्या चौकशीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाकडून वर्धेत देण्यात आलेल्या प्रस्तावांवर आक्षेप घेतला आहे. तसा नोटीस प्राप्त झाला आहे. परंतु सदर नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे येणे अपेक्षित होते. त्या काळात शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर होते. मी उपशिक्षणाधिकारी होतो. यामुळे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. म्हणून सदर नोटीस परत पाठविला आहे. - अशोक लांजेवार, उपशिक्षणाधिकारी, (तत्कालीन) माध्यमिक, जि.प. वर्धा