शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रसुलाबाद ते कवठा रस्त्याला उदासीनतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:20 IST

कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो.

ठळक मुद्देडांबरीकरणाची मागणी धूळखात : नाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्करसुलाबाद : कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो. याकडे लक्ष देत रस्त्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.मागील ३० वर्षांपासून ग्रामस्थ रसुलाबाद ते कवठा (रेल्वे) या तीन किमी रस्त्याच्या डांबरीकरण तथा नाला दुरूस्तीची मागणी करीत आहेत. अनेक आमदार, खासदार झाले; पण कुणीही याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, नागरिकांना खड्डेमय रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. रस्त्याची गिट्टी पूर्णत: उखडली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गावाशेजारी दहा फुट खोली असलेल्या या रस्त्यावर नाला आहे. मागील वर्षी या नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात या नाल्यात अडीच फुटांपर्यंत पाणी असते. रस्त्यावरील गिट्टी, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही ठेचाळत मार्गक्रमण करावे लागते. हा रस्ता टाळायला झाल्यास पुलगावला फेरा मारून जावे लागते. वर्धा, देवळी, मलकापूर, केळापूर, दहेगाव आदी ठिकाणी जाणारे नागरिक पुलगाव येथून जातील; पण या रस्त्यावर शेती असलेल्या नागरिकांना मात्र नाईला म्हणून खड्ड्यांतून मार्ग काढतच ये-जा करावी लागत आहे.खड्डेमय रस्त्याने एकदा नागरिक ये-जा करतीलही; पण शेतात साहित्याची ने-आण करणे, शेतमाल घरी नेणे आदी कामे करताना कसरत करावी लागते. दहा फुट खोल नाल्यातून बंडी ओढावी लागत असल्याने बैलांचेही हाल होतात. रेल्वेसाठी कवठा मार्ग जवळचा असल्याने अनेक गावांतील नागरिक या मार्गाचा अवलंब करतात. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. ग्रामसभेत ठराव घेतले; पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देत रस्ता तथा पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.