शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

रसुलाबाद ते कवठा रस्त्याला उदासीनतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:20 IST

कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो.

ठळक मुद्देडांबरीकरणाची मागणी धूळखात : नाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्करसुलाबाद : कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो. याकडे लक्ष देत रस्त्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.मागील ३० वर्षांपासून ग्रामस्थ रसुलाबाद ते कवठा (रेल्वे) या तीन किमी रस्त्याच्या डांबरीकरण तथा नाला दुरूस्तीची मागणी करीत आहेत. अनेक आमदार, खासदार झाले; पण कुणीही याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, नागरिकांना खड्डेमय रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. रस्त्याची गिट्टी पूर्णत: उखडली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गावाशेजारी दहा फुट खोली असलेल्या या रस्त्यावर नाला आहे. मागील वर्षी या नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात या नाल्यात अडीच फुटांपर्यंत पाणी असते. रस्त्यावरील गिट्टी, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पादचाऱ्यांनाही ठेचाळत मार्गक्रमण करावे लागते. हा रस्ता टाळायला झाल्यास पुलगावला फेरा मारून जावे लागते. वर्धा, देवळी, मलकापूर, केळापूर, दहेगाव आदी ठिकाणी जाणारे नागरिक पुलगाव येथून जातील; पण या रस्त्यावर शेती असलेल्या नागरिकांना मात्र नाईला म्हणून खड्ड्यांतून मार्ग काढतच ये-जा करावी लागत आहे.खड्डेमय रस्त्याने एकदा नागरिक ये-जा करतीलही; पण शेतात साहित्याची ने-आण करणे, शेतमाल घरी नेणे आदी कामे करताना कसरत करावी लागते. दहा फुट खोल नाल्यातून बंडी ओढावी लागत असल्याने बैलांचेही हाल होतात. रेल्वेसाठी कवठा मार्ग जवळचा असल्याने अनेक गावांतील नागरिक या मार्गाचा अवलंब करतात. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. ग्रामसभेत ठराव घेतले; पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देत रस्ता तथा पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.