शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ई-संग्राम केंद्र झाले वरकमाईचे साधन

By admin | Updated: June 30, 2014 00:03 IST

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याचे धोरण शासनाने राबविले़ त्यानुसार राज्यात ग्रामपंचायतमध्ये ई-संग्राम केंद्र स्थापन आहे़ या केंद्रांतून १८ प्रकारचे

आष्टी (श़) : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याचे धोरण शासनाने राबविले़ त्यानुसार राज्यात ग्रामपंचायतमध्ये ई-संग्राम केंद्र स्थापन आहे़ या केंद्रांतून १८ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते; पण यातून प्राप्त रकमेची पावती दिली जात नाही़ पैशाची नोंद ग्रा़पं़ च्या कुठल्याही खात्यात नाही़ यामुळे ई-संग्राम केंद्र सध्या वरकमाईचे साधन बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ई-संग्राम केंद्र ग्रा़पं़ च्या खोलीमध्ये सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात १६५ ग्रा़पं़ कार्यालयात आजही वीज पुरवठा नाही़ त्यामुळे येथे भाड्याच्या विजेवर काम भागविणे सुरू आहे़ उर्वरित ग्रा़पं़ मध्ये असलेल्या वीज पुरवठ्यावर संगणक सुरू आहेत़ संगणकासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे़ ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा फज्जा उडाला असल्याने वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही़ दिवसभरात केव्हाही इंटरनेट सेवा सुरू होते़ त्यावेळी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही़ नागरिक ग्रामसेवकांच्या मागे फिरून त्रस्त होतात़ अनेक ग्रामसेवक भ्रमणध्वनी बंद करून घरीच राहतात़ त्यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा वचक नाही़ एका महिन्यात १० ते १२ दिवसच ग्रामसेवक कर्तव्यावर येतात़ यामुळे ई-संग्राम केंद्राच्या सुविधा वेळेवर मिळत नाही़ ई-संग्राम केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रिंटेड कागदाचा दर्जा जे सिरीज असायला पाहिजे; पण या कागदांवर जिल्ह्यात कुठेही प्रमाणपत्र मिळत नाही़ साध्या कागदावर प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जाते़ यासाठी प्रती दाखला २५ रुपये घेतले जातात़ नागरिकांनी पैसे दिल्यानंतर पावती दिली जात नाही़ हा पैसा कुठल्या उत्पन्नात जमा होतो, हे कळण्यास मार्ग नाही़ ग्रा़पं़ने किती लोकांना दाखले दिले, याचीही नोंद नाही़ या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ शासनाच्या योजना चांगल्या आहेत; पण त्या राबविणारी यंत्रणा कुचकामी आहे़ यामुळे योजनांची वाट लागत आहे़ अस्तित्वात असणाऱ्या योजनांची वरचेवर तपासणी करण्यास येणारे पथक हात ओले करून परत जातात़ यामुळे जिल्ह्यातील सर्व ई-संग्राम केंद्राची त्वरित तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़(प्रतिनिधी)