शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

ई-संग्राम केंद्र झाले वरकमाईचे साधन

By admin | Updated: June 30, 2014 00:03 IST

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याचे धोरण शासनाने राबविले़ त्यानुसार राज्यात ग्रामपंचायतमध्ये ई-संग्राम केंद्र स्थापन आहे़ या केंद्रांतून १८ प्रकारचे

आष्टी (श़) : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याचे धोरण शासनाने राबविले़ त्यानुसार राज्यात ग्रामपंचायतमध्ये ई-संग्राम केंद्र स्थापन आहे़ या केंद्रांतून १८ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते; पण यातून प्राप्त रकमेची पावती दिली जात नाही़ पैशाची नोंद ग्रा़पं़ च्या कुठल्याही खात्यात नाही़ यामुळे ई-संग्राम केंद्र सध्या वरकमाईचे साधन बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ई-संग्राम केंद्र ग्रा़पं़ च्या खोलीमध्ये सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात १६५ ग्रा़पं़ कार्यालयात आजही वीज पुरवठा नाही़ त्यामुळे येथे भाड्याच्या विजेवर काम भागविणे सुरू आहे़ उर्वरित ग्रा़पं़ मध्ये असलेल्या वीज पुरवठ्यावर संगणक सुरू आहेत़ संगणकासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे़ ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा फज्जा उडाला असल्याने वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही़ दिवसभरात केव्हाही इंटरनेट सेवा सुरू होते़ त्यावेळी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही़ नागरिक ग्रामसेवकांच्या मागे फिरून त्रस्त होतात़ अनेक ग्रामसेवक भ्रमणध्वनी बंद करून घरीच राहतात़ त्यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा वचक नाही़ एका महिन्यात १० ते १२ दिवसच ग्रामसेवक कर्तव्यावर येतात़ यामुळे ई-संग्राम केंद्राच्या सुविधा वेळेवर मिळत नाही़ ई-संग्राम केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रिंटेड कागदाचा दर्जा जे सिरीज असायला पाहिजे; पण या कागदांवर जिल्ह्यात कुठेही प्रमाणपत्र मिळत नाही़ साध्या कागदावर प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जाते़ यासाठी प्रती दाखला २५ रुपये घेतले जातात़ नागरिकांनी पैसे दिल्यानंतर पावती दिली जात नाही़ हा पैसा कुठल्या उत्पन्नात जमा होतो, हे कळण्यास मार्ग नाही़ ग्रा़पं़ने किती लोकांना दाखले दिले, याचीही नोंद नाही़ या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ शासनाच्या योजना चांगल्या आहेत; पण त्या राबविणारी यंत्रणा कुचकामी आहे़ यामुळे योजनांची वाट लागत आहे़ अस्तित्वात असणाऱ्या योजनांची वरचेवर तपासणी करण्यास येणारे पथक हात ओले करून परत जातात़ यामुळे जिल्ह्यातील सर्व ई-संग्राम केंद्राची त्वरित तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़(प्रतिनिधी)