शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

वाढत्या गुन्हेगारीने महासंचालक चिंतेत

By admin | Updated: May 5, 2016 02:27 IST

यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, चोऱ्या, वाटमारी या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यवतमाळ जिल्हा : ‘आयजी’ घेणार आज आढावा यवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, चोऱ्या, वाटमारी या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत थेट राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांना गुरुवारी ५ मे रोजी यवतमाळात क्राईम मिटींगसाठी पाठविण्यात आले आहे. अमरावतीचे महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल रजेवर आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार राज्य राखीव पोलीस दलाचे नागपूर येथील महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे आहे. ते गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. विशेष असे यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह हेसुद्धा ११ मेपर्यंत रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त प्रभार अपर अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्याकडे आहे. जानेवारी ते एप्रिल २०१६ या चार महिन्यात जिल्ह्यात प्रॉपर्टी व शरीरासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात तर दरदिवशी कुठे खून, कुठे घरफोडी तर कुठे वाटमारी जणू नित्याचीच झाली होती. खून, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झाले. जुना गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच नवा गुन्हा घडत आहे. ही गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही होताना दिसत नाही. सर्रास गुन्हे घडत आहे. परंतु डिटेक्शनचा पत्ता नाही. भरदिवसा घरफोड्या होत आहेत. चोरटे लाखो रुपयांच्या रोकड, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करीत आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या, बॅग हिसकावण्याच्या घटना घडत आहे. मात्र चोरटे शोधण्यात पोलिसांना यश येत नाही. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याचा क्राईम चार्ट पाहून खुद्द पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही चिंता व्यक्त केली. अखेर या वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे, डिटेक्शन वाढविणे याबाबत मार्गदर्शन करून गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी खास पोलीस महानिरीक्षकांना महासंचालकांनी जिल्ह्यात पाठविले. गुरुवारी ते क्राईम मिटींग घेऊन महासंचालकांना अहवाल सादर करणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) एकाच महिन्यात ११ खून सन २०१६ मध्ये एकट्या मार्च महिन्यात जिल्ह्यात तब्बल खुनाच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खुनाचा प्रयत्न ११, बलात्कार १०, दंगे २८, दुखापत १२८, महिलांसंबंधीचे गुन्हे १२६, दरोड्याचा प्रयत्न १ तर अ‍ॅट्रोसिटीचे १४ गुन्हे एकाच महिन्यात नोंदविले गेले आहे. अशीच आकडेवारी एप्रिल महिन्याचीसुद्धा आहे. काही प्रकरणात त्यात उलट वाढ झाली आहे. घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत डिटेक्शन मात्र नसल्यात आहे. जिल्हा दंडाधिकारीही नाराज यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या सध्याच्या कामगिरीवर खुद्द जिल्हा दंडाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पोलिसांची पकड सैल झाल्याचे नमूद करीत त्यांनी ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कक्षात बोलावून चांगलीच झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते.