शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

शिवाजी पुतळा ते कारला चौकापर्यंत धुळीचा रस्ता

By admin | Updated: October 20, 2016 01:05 IST

कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते.

पुलाचे बांधकाम अर्धवट : रस्त्याचे डांबरीकरण उखडलेवर्धा : कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशातच जडवाहन गेल्यास धुळीचे लोट उठतात. त्यामुळे काही क्षणाकरिता दुचाकी वाहनधारकांना समोरचे दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्यावरील धुळीमुळे सर्दी, खोकला आणि नेत्रविकार होण्याचा धोका आहे. ही बाब आरोग्याचा दृष्टीने धोकादायक ठरत आहे. शिवाजी पुतळा ते आर्वी नाका पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे गिट्टी व चुरी बाहेर पडली आहे. यावरून वाहन घसरण्याचा धोका असतो. या मार्गावर शिकवणी वर्ग, शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी अधिक असते. अग्रगामी शाळेजवळील बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. एका बाजुचे काम पूर्ण झाले. डांबर टाकले नसल्याने पुलावरून वादळ गेल्यावर धुळीचे लोळ उठतात.(कार्यालय प्रतिनिधी) पुलाचे अर्धवट बांधकामअग्रगामी शाळेजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम मागील वर्षीपासून सुरू झालेले आहे. अद्याप पुलाचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. या करिता रस्ता खोदल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्यावर खड्डे तयार झाल्याने यातून वादळ गेल्यास धुळ उडते. दुचाकीचालकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. पुलाचे एका बाजुचे बांधकाम झाले तरी त्यावर डांबरीकरण केलेले नाही. त्यामुळे या पुलावरून जडवाहन गेल्यास रस्त्यावर धुळ उडते. ही बाब अपघातास कारण ठरत आहे. या मार्गाने वाहन चालविताना डोळ्यात जाणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.