शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच

By admin | Updated: November 5, 2016 00:56 IST

दिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे.

दिवसा उकाडा रात्री थंडी : वर्धेकरांना थंडीची प्रतीक्षामहेश सायखेडे  वर्धादिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे. यामुळे दिवसा उकाडा आणि रात्रीला थोडी थंडी असे काहीचे वातावरण वर्धेंकरांना अनुभवायला येत आहे. असे असले तरी यंदा जिल्ह्यात थंडीची चांगलीच हुडहुडी भरणार असल्याचे बोलले जात आहे. याच गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी गत आठ महिने आलमारीत ठेवले जाणारे गरम कपडे बाहेर काढले आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरमध्ये अपवादात्मक तापमान ३१ अंशावर जाते. परंतु, यंदा ४ नोव्हेंबर रोजी ३२ अंश इतकी कमाल तापमानाची नोंद होत आहे. दिवसा अंगाला चटके देणारी ऊन्ह तर रात्री थंडी जाणवत आहे. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णात वाढ होत आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल दिसत आहे. जिल्ह्यात किमान तापमान घसरत असल्याचे दिसून येते. यामुळे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. ही थंडी गरम कपडे घालण्याइतपत नसल्याचे बोलले जात आहे. शहरी भागात नसली तरी ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. सध्या शेतात उत्पन्न निघत आहे. तर काहींच्या शेतात ते उभे आहे. यामुळे शेतकरी शेतात जागलीला जात आहे. येथे थंडीची कुडकुड जाणत असल्याने शेकोटीचा आसरा घेत असल्याचे चित्र आहे. सध्या रात्रीचे तापामन गडगडत असल्याने तापमानात कमालीची घट होत असली तरी हुडहुडीला अजून प्रतीक्षा वर्धेकरांना करावी लागणार असल्याचे दिसते.तूर पिकासाठी थंडी फायदेशीर, पण ढगाळ वातावरणाचे सावटजिल्ह्यात खरीपात सोयाबीन, तूर, कपाशी तर रब्बी हंगामात गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. अनेक शेतात सध्या तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पडत असलेल्या थंडीचा लाभ या तुरीच्या पिकाला होणार आहे. थंडीमुळे या पिकांची जोमात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात.ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रकोपथंडीचा जोर वाढत असताना अचानक गत दोन दिवसांपासून आकाशात काही प्रमाणात ढगाळी वातावरण येत आहे. याचा विपरीत परिणाम तुरीवर होत असून अळीरचा हल्ला होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रात्रीला थंडी पडत असून त्याचा लाभ तुरीला होईल असे वाटत असताना या ढगाळ वातावरणामुळे धोक्याचे सावट घोंगावत आहे.