शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संपकाळात जिल्ह्यात एसटीच्या तीन बसेसवर झाली दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचे एकूण २० हजारांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या पूर्वीपासून रापमचे कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. निम्म्याहून अधिक रापमच्या कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन अजूनही कायम असले तरी याच संप काळात जिल्ह्यात रापमच्या तीन बसेसवर दगडफेक झाली. या नुकसानग्रस्त बसेसमधील एक बस यवतमाळ जिल्ह्यातील असून, दोन बसेस या आर्वी आगाराच्या आहेेत. आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचे एकूण २० हजारांचे नुकसान झाले आहे.

संपाचा सर्वाधिक आर्थिक फटका वर्धा आगाराला-    जिल्ह्यात पुलगाव, वर्धा, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे एकूण राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत. या पाचही आगारांतून दररोज सुमारे ८५० बस फेऱ्यांचे नियोजन होते. पण कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासूनच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा येथील आगारातून अद्याप एकही बस सोडण्यात आलेली नाही. परिणामी, संपाचा सर्वाधिक आर्थिक फटका वर्धा आगाराला बसल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

तळेगाव अन् वडनेर ठाण्यात गुन्हे दाखल-    यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराच्या बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात तर आर्वी आगारातील दोन बसेसवर दगडफेक करून बसेसचे नुकसान केल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

या मार्गांवर धावत आहेत रापमच्या बसेस-    निम्म्याहून अधिक रापमचे कर्मचारी कामबंद आंदाेलनात सहभागी राहून सध्या विलीनीकरणाचा लढा देत आहेत. असे असले तरी काही कर्मचारी विविध कारणांमुळे कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही आगारांतून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस पोलीस बंदोबस्तात सोडल्या जात आहेत. सध्या हिंगणघाट आगारातून हिंगणघाट-सिर्सी, तळेगाव आगारातून तळेगाव-आष्टी तर आर्वी आगारातून आर्वी-पुलगाव व आर्वी-आष्टी मार्गावर बसेस सोडल्या जात आहेत.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप