शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भाजपाच्या काळात राज्य प्रगतिपथावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:32 IST

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे.

ठळक मुद्देशिवराय कुलकर्णींची पत्रपरिषद : विकास कामांचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे. मागील तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य प्रगतिच्या दृष्टीने आघाडीवर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.भारतीय जनता पार्टीच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने काय विकासपयोगी काम केले याची माहिती देण्यासाठी प्रदेश प्रवक्ते आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, उपाध्यक्ष मनोज तरारे, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, प्रा उषा थुटे, संपर्क प्रमुख राहुल चोपडा, विस्तारक जीवन सुर्वे, जिल्हा चिटनिस प्रा.किरण वैद्य, प्रदीप जोशी, डॉ. विजय पर्बत उपस्थित होते.काँग्रेसच्या काळात कृषी विकासाचा दर मायनस (शून्य) होता. तो गत तीन वर्षात १२ टक्के झालेला आहे. भाजपने ऐतिहासिक ३४ हजार २२ कोटी रुपयाची कर्जमाफी करून ७० लाख शेतकºयांची कर्जातून मुक्ती केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकालात संपूर्ण देशात ७० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्या वेळच्या कर्जमाफित शेतकरी नादार करुन ४० लाख शेतकरी बँकेच्या कर्ज घेण्याच्या कार्यप्रणालीतुन बाद झाले होते; परंतु भाजपा सरकारने शेतकºयांची पत कायम ठेऊन कर्जमाफी करून गरजवंत शेतकºयांचा लाभ करून दिलेला आहे.शेतकरी संकटमुक्त झालेला नसून, समस्याचा डोंगर कायम आहे. गत १५ वर्षांत काँग्रेसच्या आघाडी सरकारने जे खड्डे करून ठेवले होते ते बुजवीत फडणवीस सरकारने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जलयुक्त शिवार योजना राबवून राज्यातील २० लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढविली आहे. सन २०११ पासून एक लाख विस हजार विजेचे कनेक्शन प्रलंबित होते ते पूर्णपणे लावण्यात आले आहे. उज्वला गॅस योजनेतून जिल्ह्यातील २८ हजार ८२० महिलांना गॅस जोडणी दिली. मेक इन महाराष्ट्र या योजनेत राज्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याने रोजगाराची संधी दिल्याचेही ते म्हणले.