शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:50 IST

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : शाळांची टाळाटाळ, तर पालकांची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी काढण्यात आली. या सोडतीत ४३९ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या सोडतीनंतर शाळांची टाळाटाळ आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल असलेली अनभिज्ञता यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवेशाकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली. आताही दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता २९ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या दिवासात तरी पालकांनी प्रवेश नोंदविणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्याअंतर्गत २०१९-२० च्या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता जिल्ह्यातील १३३ शाळांची निवड करण्यात आली. या सर्व शाळांमध्ये १ हजार ४०३ जागा रिक्त असताना तब्बल ३ हजार ९९५ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला पहिली सोडत काढली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थी पात्र झाले होते.सुरुवातीला शाळांची टाळाटाळ आणि पालकांचीही अनभिज्ञता यामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही २९० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. यातच दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर १५ जून रोजी दुसरी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ४३९ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश करण्याची मुदत दिली होती.परंतु बहूतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतला नसल्याने त्यामध्ये दोन दिवसाची मुदतवाढ करण्यात आला. २९ जून ही अंतिम मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रवेश घेतला नाही तर ते या प्रक्रि येतून बाद होण्याची शक्यता नाकारत येत नाही.