शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:50 IST

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : शाळांची टाळाटाळ, तर पालकांची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी काढण्यात आली. या सोडतीत ४३९ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या सोडतीनंतर शाळांची टाळाटाळ आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल असलेली अनभिज्ञता यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवेशाकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली. आताही दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता २९ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या दिवासात तरी पालकांनी प्रवेश नोंदविणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्याअंतर्गत २०१९-२० च्या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता जिल्ह्यातील १३३ शाळांची निवड करण्यात आली. या सर्व शाळांमध्ये १ हजार ४०३ जागा रिक्त असताना तब्बल ३ हजार ९९५ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला पहिली सोडत काढली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थी पात्र झाले होते.सुरुवातीला शाळांची टाळाटाळ आणि पालकांचीही अनभिज्ञता यामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही २९० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. यातच दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर १५ जून रोजी दुसरी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ४३९ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश करण्याची मुदत दिली होती.परंतु बहूतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतला नसल्याने त्यामध्ये दोन दिवसाची मुदतवाढ करण्यात आला. २९ जून ही अंतिम मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रवेश घेतला नाही तर ते या प्रक्रि येतून बाद होण्याची शक्यता नाकारत येत नाही.