शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:50 IST

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : शाळांची टाळाटाळ, तर पालकांची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी काढण्यात आली. या सोडतीत ४३९ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या सोडतीनंतर शाळांची टाळाटाळ आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल असलेली अनभिज्ञता यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवेशाकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली. आताही दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता २९ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या दिवासात तरी पालकांनी प्रवेश नोंदविणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्याअंतर्गत २०१९-२० च्या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता जिल्ह्यातील १३३ शाळांची निवड करण्यात आली. या सर्व शाळांमध्ये १ हजार ४०३ जागा रिक्त असताना तब्बल ३ हजार ९९५ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला पहिली सोडत काढली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थी पात्र झाले होते.सुरुवातीला शाळांची टाळाटाळ आणि पालकांचीही अनभिज्ञता यामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही २९० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. यातच दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर १५ जून रोजी दुसरी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ४३९ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश करण्याची मुदत दिली होती.परंतु बहूतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतला नसल्याने त्यामध्ये दोन दिवसाची मुदतवाढ करण्यात आला. २९ जून ही अंतिम मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रवेश घेतला नाही तर ते या प्रक्रि येतून बाद होण्याची शक्यता नाकारत येत नाही.