शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 26, 2016 01:46 IST

विमुक्त भटक्या जमातीच्या संघटनांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजाच्या वाट्याला वंचिताचे जगणे येत आहे,

तालुकानिहाय निवेदन : धोरणांचा निषेधवर्धा : विमुक्त भटक्या जमातीच्या संघटनांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजाच्या वाट्याला वंचिताचे जगणे येत आहे, असा आरोप करीत सोमवारी तालुकानिहाय मोर्चे काढून तहसील कार्यालयांवर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या जिल्ह्यात निघालेल्या या मोर्चांमध्ये भोई, कहार, ढीवर, लोहार, बंजारा, धनगर, बेलदार, ओतारी, गवळी, नाचजोगी, गोसावी, वडार, बहुरूपी, सरोदे, गोंधळी, डोंबारी, भामटा, छप्परबंद, गारोडी, भाट, रामोशी, वंजारी आदी जमातीच्या समाजबांधवाचा समावेश होता. वर्धेत मोर्चा काढत समाजबांधवांनी विविध मागण्यांकरिता तहसील कार्यालयावर धडक दिली. देवळी तालुक्यात मिरणनाथ मंदिर ते शहराचे मुख्य मार्गाने निघालेल्या मोर्चात विविध घोषणांच्या माध्यनातून अन्यायावर बोट ठेवले. यावेळी तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी मोर्चेकरांना सामारे जावून निवेदन स्वीकारले. शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. सेलू येथे निघालेल्या मोर्चाने तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. तहसीलदारांना केले निवेदन सादरवर्धा : देवळी येथे निवेदनाप्रसंगी पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने व उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे होत असताना आमचा समाज उपेक्षांची धग हृदयात ठेवून वंचिताचे जीवन जगत आहे. शिक्षणातील सोयी-सवलती व नोकरीतील आरक्षण देण्यात आले; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीप्रमाणे विमुक्त भटक्या समाजाला ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ११ टक्क्याचे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या तुलनेत आर्थिक तरतूद करण्यात यावी. मच्छीमार संस्थाच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य तसेच हाताला काम देण्यात यावे. वनहक्क कायद्यानुसार मच्छीमारांना मासेमारीचे तसेच पशुपालकांना चराईचे हक्क देण्यात यावे. घरकुल योजना लागू करण्यात यावी, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी. अनुसूचित जाती, जमातीप्रमाणे जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्यात यावी यासह आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.वर्धा येथे निवेदन सादर करताना चंद्रशेखर मेंडेवार, संजय नाल्हे, संजय काट्टेवार, डॉ. विद्या राजेंद्र कळसाईत, अश्विनी डेहनकर यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती. देवळी येथे किरण पारीसे, विनोद राठोड, भास्कर शिंदे, कृष्णा नांदने, प्रमोद बमनोटे, प्रमोद वऱ्हाडे, नामदेव गरवारे, अशोक पचारे, दिनेश बढये श्रावण मंडले, राहुल उगले, सुदाम करलुके, चंद्रभान शिवरकर, गजानन चव्हाण, प्रल्हाद चवरे, मनोहर पचारे, प्रसाद शिंदे, ज्योतीवंत सुरनकर, नरेश पारीसे तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत निवेदन दिले. सेलू येथे मिलिंद हिवलेकर, हरिष पारसे, रमेश नान्हे, दशरथ पांडे, लक्ष्भी डोंगरे, फुलचंद चव्हाण, सुंदरलाल शिंदे यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)