शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचा पचका

By admin | Updated: July 28, 2016 00:37 IST

आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे.

प्रशासनाची उदासीनता : सहा महिन्यांचे काम नऊ महिन्यांवर जाण्याची शक्यता वर्धा : आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर डायव्हर्जन दिल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसामुळे पाणी साचून रस्त्याला खड्डे पडले आहे. पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहतुकीचा पचका हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या मार्गावर असलेल्या मुख्य नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम विभागामार्फत सदर काम करण्यात येत आहे. याकरिता सहा महिन्यांचा कालावधी प्रस्तावित होता. बांधकाम करण्याकरिता आर्वी मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. जडवाहणे, प्रवासी वाहतूक तसेच शाळकरी मुले, कर्मचारी यांची सतत ये-जा सुरू असते. या मार्गावर मंगल कार्यालये गर्दी जास्त असते. एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण जात आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. पुलाच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात जागा नाही. त्यामुळे या भागात पाणी साचते. सातत्याने पाणी साचल्यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे येथे पाणी साचून तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डे पडले असून रस्ता उखडला आहे. मध्यंतरी बीएसएनएलने केबल टाकण्याचे काम केले. याकरिता रस्ता खोदला. मात्र केबल नाली व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्यावर मधोमध उंचवटे तयार झाले. वाहन काढणे जिकरीचे झाले आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी) नागरिक बांधकाम विभागावर धडकले नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडल्याने आधीच वाहतुकीचा पचका झाला आहे. त्यातच मंगळवारी रात्री तासभर झालेल्या दमदार पावसामुळे आसपासच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यात अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील महिला बुधवारी बांधकाम विभागावर धडकल्या. यावेळी त्यांनी पुलाचेर बांधकाम त्वरित करावे अशी मागणी लावून धरली. हा प्रकार नित्याचाच झाल्याचेही महिलांनी सांगितले. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. पण पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. कामाचे स्वरूप पाहता याला आणखी तीन महिन्यांचा कालावधी ंलागू शकतो. त्यामुळे सहा ऐवजी नऊ महिन्यात सदर काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. काम लवकर पूर्ण करण्याचाच प्रयत्न आहे. - एम. डब्यू. धांदे, अभियंता.