शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचा पचका

By admin | Updated: July 28, 2016 00:37 IST

आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे.

प्रशासनाची उदासीनता : सहा महिन्यांचे काम नऊ महिन्यांवर जाण्याची शक्यता वर्धा : आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेनजीकच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर डायव्हर्जन दिल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसामुळे पाणी साचून रस्त्याला खड्डे पडले आहे. पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहतुकीचा पचका हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या मार्गावर असलेल्या मुख्य नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम विभागामार्फत सदर काम करण्यात येत आहे. याकरिता सहा महिन्यांचा कालावधी प्रस्तावित होता. बांधकाम करण्याकरिता आर्वी मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. जडवाहणे, प्रवासी वाहतूक तसेच शाळकरी मुले, कर्मचारी यांची सतत ये-जा सुरू असते. या मार्गावर मंगल कार्यालये गर्दी जास्त असते. एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण जात आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. पुलाच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात जागा नाही. त्यामुळे या भागात पाणी साचते. सातत्याने पाणी साचल्यामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे येथे पाणी साचून तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डे पडले असून रस्ता उखडला आहे. मध्यंतरी बीएसएनएलने केबल टाकण्याचे काम केले. याकरिता रस्ता खोदला. मात्र केबल नाली व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्यावर मधोमध उंचवटे तयार झाले. वाहन काढणे जिकरीचे झाले आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी) नागरिक बांधकाम विभागावर धडकले नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडल्याने आधीच वाहतुकीचा पचका झाला आहे. त्यातच मंगळवारी रात्री तासभर झालेल्या दमदार पावसामुळे आसपासच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यात अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील महिला बुधवारी बांधकाम विभागावर धडकल्या. यावेळी त्यांनी पुलाचेर बांधकाम त्वरित करावे अशी मागणी लावून धरली. हा प्रकार नित्याचाच झाल्याचेही महिलांनी सांगितले. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. पण पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. कामाचे स्वरूप पाहता याला आणखी तीन महिन्यांचा कालावधी ंलागू शकतो. त्यामुळे सहा ऐवजी नऊ महिन्यात सदर काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. काम लवकर पूर्ण करण्याचाच प्रयत्न आहे. - एम. डब्यू. धांदे, अभियंता.