शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

जलयुक्त शिवारमुळे पडिक शेती होणार हिरवी

By admin | Updated: March 28, 2017 01:08 IST

उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती.

पुराचा धोका टळणार : उमरगाव येथील शेतकऱ्यांना दिलासाझडशी : उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती. परिणामी, शेतकरी शेती पडिक ठेवत होते. जलयुक्त शिवार अभियानात या नदीचे खोलीकरण तथा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यामुळे ही शेती वहिवाटीखाली येणार आहे.उमरगाव परिसरातील पंचधारा नदी काठावरील बहुतांश शेतकऱ्यांचे शेती पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे पडिक राहत होती. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी अर्ज दिले. तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. यामुळे दोन वर्षांपासून शेती पडिक होती. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. कुणाल जयस्वाल यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत सर्व शेतकऱ्याचे एकत्रित अर्ज जि.प. लघुसिंचन विभाग यांना सादर केले. पंचधारा नदीवर साठवण बंधाऱ्याची मागणी केली. गतवर्षी शिवारफेरीमध्ये सरपंच यांनीही जलयुक्त शिवार योजनेतून कामांची शिफारस केली. यावरून नदीच्या रूंदीकरणासह खोलीकरण करण्यात आले. शिवाय बांधबंधिस्ती केली. यामुळे पावसाळ्यातील पुराचा धोका टळला आहे. यंदा शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करता येणार आहे. यातील २०० ते ३०० मिटरचे काम अर्धवट राहिले असून ते काम पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.(वार्ताहर)