शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

मुसळधार पावसामुळे खरडली शेतजमीन

By admin | Updated: July 6, 2016 02:30 IST

गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

बांध फुटल्याने शेती जलमय : सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे नुकसानवर्धा/पिंपळखुटा : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यातच सोमवारी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल दोन तास ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळल्याने सात गावांतील १०० च्या वर शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले. या पावसामुळे ८५ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळखुटा परिसरातील शेतजमिनी खरडून गेल्या. कित्येक शेतांचे बंधारे फुटल्याने बियाणे अंकुरण्यापूर्वीच मातीखाली दबले. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. वाढोणा येथे पर्जन्यमापक यंत्र आहे. तेथे ३६ मिली पावसाची नोंद घेण्यात आली; पण पिंपळखुटा परिसरात यापेक्षा अधिक पाऊस झाला. तलाठी रजेवर व कृषी सहायक प्रशिक्षणाला गेल्याने शेतकऱ्यांना वेळेत तक्रार देता आली नाही. प्रत्येक शेतात पाणी साचले आहे. तरोडा येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. श्यामसुंदर भुतडा यांची विहीर पावसामुळे खचली आहे. वाहतूकही विस्कळीत झाली होती. तरोडा येथे विठ्ठल वाघ यांच्या घराच्या भिंती पडल्या. तरोडा येथे तुकाराम थूल यांच्या शेतात नाल्याचा पूर गेल्याने शेत खरडून गेले. सुरेश ढोले, मंदा गायकवाड, ज्ञानेश्वर धपाट, ओमप्रकाश भुतडा, होरेश्वर कालोकार, गोलू शाहू, भास्कर जाधव यांच्याही शेताचे नुकसान झाले. मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची कृषी व महसूल विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)