शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सर्जीकल स्ट्राईकमुळे दशहतवादाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:31 IST

पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र निंभोरकर : वडाळा जन्मभूमीत सत्कार हाच मोठा पुरस्कार

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.वडाळा या जन्मभूमीत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भावपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय जलसंपदा विभागाचे ओएसडी सुधीर दिवे, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव धनंजय धवड, पी.आर. कॉलेजचे संस्थापक रामचंद्र पोटे, वडाळा सरपंच द्रोपदा बºहाणपुरे, वर्धपूरचे सरपंच लता पोटे, ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर, कॅप्टन विलास निंभोरकर व तिन्ही भावांच्या पत्नी मंचावर विराजमान होत्या.यावेळी गुरूकुंज आश्रम मोझरी येथून आलेल्या चमुने भारत पाकीस्तान युद्धामधील ‘देश के प्यारे वीर शहीदो तुमको करू प्रणाम’ व स्वागतगीत सादर केले. यानंतर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या संपूर्ण कार्याचा परिचय दिलीप निंभोरकर यांनी दिला.यानंतर गावकºयांनी ले.जनरल यांना सलामी देत त्यांचा भावपूर्ण सत्कार केला सोबतच त्यांच्या दोन्ही भावांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, आतापर्यंत जेवढे कर्तृत्वाचे मेडल मिळाले त्यापैकी गावकरी यांनी दिलेली गौरव व सत्कार हे माझ्या जीवनाचे सर्वात मोठे मेडल आहे.यावेळी लता पोटे यांनी ले.जनरल यांच्या कार्याबद्दल उपवनसरंक्षक अमरावतीचे कविटकर यांनी वºहाडी भाषेत रचलेली कर्तव्यदक्षता ही कविता सादर केली. धनंजय धवड यांनी मन हाऊस ते गण हाऊस आत्मचरित्र लिहिण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचा सत्कार झाला. यावेळी शाल श्रीफळ, सन्मानपत्र, साडीचोळी देऊन तिन्ही भावंडासह त्यांच्या पत्नींचा सत्कार केला. संचालन प्रा. विनोद पेठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निष्ठा निंभोरकर यांनी मानले. यावेळी वडाळा, वर्धपूर येथील गावकरी तालुक्यातील नागरिक, अमरावती, नागपूर वर्धा येथून असंख्य नागरिक आले होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.