शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गटारांमुळे घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम केले जात असले....

दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : रविवारचे स्वच्छता अभियानही निरूपयोगीवर्धा : शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम केले जात असले तरी जुन्या गटारांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. परिणामी, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रभाग क्र. १८ मध्ये रविवारचे स्वच्छता अभियान पालिका प्रशासनाने राबविले; पण गटार व दुर्गंधी कायम असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगर पालिका प्रशासनाकडून शहरात विकास कामे केली जात आहेत. यात अनेक भागात रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आलीत; पण बहुतांश भागातील जुन्या समस्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जीर्ण झालेल्या नाल्या, सदोष गटारे अद्याप जैसे थे आहेत. त्या नाल्यांऐवजी नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. शिवाय गटारांमध्येही सुधारणा करण्यात आली नाही. यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभाग क्र. १८ मधील वॉर्ड क्र. २८ मध्ये बौद्ध विहाराजवळ असलेल्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्या नसल्याने या भागात सांडपाणी साचते. निचरा होत नसल्याने सांडपाण्याचे मोठे गटारच निर्माण झाले आहे. यातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न.प. प्रशासनाकडून प्रत्येक रविवारी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्रभाग क्र. १८ मध्येही स्वच्छता अभियान राबविण्यात आले; पण गटाराकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्यांची निर्मिती करीत सांडपाणी वाहते करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दहा वर्षांपासून त्या भागात नाल्याच नाहीस्थानिक अशोक नगर प्रभाग क्र. १८ अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २८ मध्ये मागील दहा वर्षांपासून नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. परिणामी, बौद्ध विहाराजवळ गटार निर्माण झाले आहे. सांडपाणी जायला जागा नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसागणिक गटार व घाणीमध्ये वाढ होत असल्याने दुर्गंधी पसरली असून विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा नगर पालिकेद्वारे प्रत्येक रविवारी स्वच्छ वर्धा अभियान राबविले जात आहे. यात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अशोक नगर येथे भेट दिली असता नागरिकांनी समस्या मांडल्या; पण त्यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला ओह. पालिका प्रशासनाने नागरिकांची ही समस्या दूर करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या गटाराबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे, शहर अध्यक्ष गौरव वानखेडे, धरम वोंडे, साहिल नाडे, आकाश हातागळे, रवींद्र शेंडे, सौरभ गायकवाड, ऋषिकेश चौकोने, बबन उपाध्याय, हेमंत भोसले, शैलेश गिरी, अरहान शेख आदी उपस्थित होते.