शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

गटारांमुळे घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम केले जात असले....

दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : रविवारचे स्वच्छता अभियानही निरूपयोगीवर्धा : शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम केले जात असले तरी जुन्या गटारांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. परिणामी, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रभाग क्र. १८ मध्ये रविवारचे स्वच्छता अभियान पालिका प्रशासनाने राबविले; पण गटार व दुर्गंधी कायम असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगर पालिका प्रशासनाकडून शहरात विकास कामे केली जात आहेत. यात अनेक भागात रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आलीत; पण बहुतांश भागातील जुन्या समस्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जीर्ण झालेल्या नाल्या, सदोष गटारे अद्याप जैसे थे आहेत. त्या नाल्यांऐवजी नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. शिवाय गटारांमध्येही सुधारणा करण्यात आली नाही. यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभाग क्र. १८ मधील वॉर्ड क्र. २८ मध्ये बौद्ध विहाराजवळ असलेल्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्या नसल्याने या भागात सांडपाणी साचते. निचरा होत नसल्याने सांडपाण्याचे मोठे गटारच निर्माण झाले आहे. यातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न.प. प्रशासनाकडून प्रत्येक रविवारी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्रभाग क्र. १८ मध्येही स्वच्छता अभियान राबविण्यात आले; पण गटाराकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्यांची निर्मिती करीत सांडपाणी वाहते करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दहा वर्षांपासून त्या भागात नाल्याच नाहीस्थानिक अशोक नगर प्रभाग क्र. १८ अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २८ मध्ये मागील दहा वर्षांपासून नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. परिणामी, बौद्ध विहाराजवळ गटार निर्माण झाले आहे. सांडपाणी जायला जागा नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसागणिक गटार व घाणीमध्ये वाढ होत असल्याने दुर्गंधी पसरली असून विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा नगर पालिकेद्वारे प्रत्येक रविवारी स्वच्छ वर्धा अभियान राबविले जात आहे. यात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अशोक नगर येथे भेट दिली असता नागरिकांनी समस्या मांडल्या; पण त्यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला ओह. पालिका प्रशासनाने नागरिकांची ही समस्या दूर करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या गटाराबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे, शहर अध्यक्ष गौरव वानखेडे, धरम वोंडे, साहिल नाडे, आकाश हातागळे, रवींद्र शेंडे, सौरभ गायकवाड, ऋषिकेश चौकोने, बबन उपाध्याय, हेमंत भोसले, शैलेश गिरी, अरहान शेख आदी उपस्थित होते.