शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

टंचाईत ‘ते’ नि:शुल्क देतात बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:22 IST

स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देसंडे अँकर । गोंड प्लॉट येथील संजय चौधरी यांची संवेदनशीलता; रहिवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.संजय पुंडलिकराव चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून केजाजी चौक, वॉर्ड क्रमांक ११ येथे त्यांचे किराणा दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून ते येथे वास्तव्याला आहेत. अल्प पर्जन्यमानामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कधी नव्हे, एवढी पाणीटंचाई निर्माण झाली. दिवस उजाडताच आया-बहिणींची आपल्या लहानग्यांसह हंडाभर पाणी मिळविण्यासाठी होणारी धावाधाव पाहून संजय यांच्या मनाला पाझर फुटला. आपल्या संस्कृतीत तहानलेल्यांना पाणी देणे पुण्याचे काम समजले जाते. हे ध्यानात घेत संजय चौधरी यांनी घराशेजारीच तब्बल ६० हजार रुपये खर्च करून विंधन विहीर केली. विंधन विहिरीला १८० फुटांवरच पाणी लागले आहे. गोंड प्लॉटमध्ये अनेकांकडे खासगी विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरीदेखील आहेत. मात्र, पाण्याचे हे सर्वच स्रोत कोरडे पडले आहेत. अनेकांनी नव्याने विंधन विहिरी केल्या; मात्र पाणीच लागले नाही.परिसरात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: घरगुती वापराकरिता पुरेल एवढे पाणी घेऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पाणी द्यायचे त्यांनी ठरविले. मागील २० दिवसांपासून ते नागरिकांना आपल्या येथील विंधन विहिरीचे पाणी कुठलेही शुल्क न घेता उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास त्यांच्याकडे पाण्याकरिता प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी मिळत असल्याने नागरिकही समाधानी असून त्यांचे आभार मानताना दिसतात. माणुसकी आजही जिवंत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.नगरसेवकांची निष्क्रियतागोंड प्लॉट, केजाजी चौक वॉर्ड क्रमांक ११ येथील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींना केव्हाच कोरड पडली आहे. नगरपालिकेद्वारे सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो, मात्र हे पाणी आठ दिवस पुरत नाही. वॉर्डात पाणीप्रश्न पेटला असताना संबंधित नगरसेवकांकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. नागरिक पाणी समस्या घेऊन नगरसेवकांकडे गेले असता टॅकरची व्यवस्था करू, असे केवळ आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठल्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविषयी नागरिकांत प्रचंड रोष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई