शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

टंचाईत ‘ते’ नि:शुल्क देतात बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:22 IST

स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देसंडे अँकर । गोंड प्लॉट येथील संजय चौधरी यांची संवेदनशीलता; रहिवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वखर्चातून केलेल्या विंधन विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून संवेदनशील मनाची व्यक्ती निम्म्या परिसराची तहान भागवत असल्याचे चित्र गोंड प्लॉट केजाजी चौक येथे पाहायला मिळाले.संजय पुंडलिकराव चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून केजाजी चौक, वॉर्ड क्रमांक ११ येथे त्यांचे किराणा दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून ते येथे वास्तव्याला आहेत. अल्प पर्जन्यमानामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कधी नव्हे, एवढी पाणीटंचाई निर्माण झाली. दिवस उजाडताच आया-बहिणींची आपल्या लहानग्यांसह हंडाभर पाणी मिळविण्यासाठी होणारी धावाधाव पाहून संजय यांच्या मनाला पाझर फुटला. आपल्या संस्कृतीत तहानलेल्यांना पाणी देणे पुण्याचे काम समजले जाते. हे ध्यानात घेत संजय चौधरी यांनी घराशेजारीच तब्बल ६० हजार रुपये खर्च करून विंधन विहीर केली. विंधन विहिरीला १८० फुटांवरच पाणी लागले आहे. गोंड प्लॉटमध्ये अनेकांकडे खासगी विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरीदेखील आहेत. मात्र, पाण्याचे हे सर्वच स्रोत कोरडे पडले आहेत. अनेकांनी नव्याने विंधन विहिरी केल्या; मात्र पाणीच लागले नाही.परिसरात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: घरगुती वापराकरिता पुरेल एवढे पाणी घेऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पाणी द्यायचे त्यांनी ठरविले. मागील २० दिवसांपासून ते नागरिकांना आपल्या येथील विंधन विहिरीचे पाणी कुठलेही शुल्क न घेता उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास त्यांच्याकडे पाण्याकरिता प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी मिळत असल्याने नागरिकही समाधानी असून त्यांचे आभार मानताना दिसतात. माणुसकी आजही जिवंत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.नगरसेवकांची निष्क्रियतागोंड प्लॉट, केजाजी चौक वॉर्ड क्रमांक ११ येथील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींना केव्हाच कोरड पडली आहे. नगरपालिकेद्वारे सात दिवसांआड पाणीपुरवठा होतो, मात्र हे पाणी आठ दिवस पुरत नाही. वॉर्डात पाणीप्रश्न पेटला असताना संबंधित नगरसेवकांकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. नागरिक पाणी समस्या घेऊन नगरसेवकांकडे गेले असता टॅकरची व्यवस्था करू, असे केवळ आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठल्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविषयी नागरिकांत प्रचंड रोष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई