शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

रेती वाहतुकीमुळे मांडगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: February 10, 2017 01:32 IST

तालुक्यातील खुणी घाटापासून मांडगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

गिट्टीही उखडली : वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्तसमुद्रपूर : तालुक्यातील खुणी घाटापासून मांडगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. येथून रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे रस्त्याची गिट्टी उघडी पडली आहे. परिणामी, वाहनचालकांसह ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची मागणी होत आहे. खुणी घाटापासून मांडगाव पर्यंतचे २ कि.मी.चे अंतर आहे. या मार्गाने जडवाहनांची वर्दळ पाहायला मिळते. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेले मालवाहू वाहने येथून दररोज ये-जा करतात. ही वाहने भरधाव असल्याने अपघाताचा धोका आहे. या मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहे. यात दुचाकी व अन्य वाहने अडखळतात. रस्त्याची गिट्टी उखडली आहे. त्यामुळे वाहने घसरतता. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रेतीची वाहतूक करणारे ग्रामपंचायत प्रशासनालाही जुमानत नसल्याची ओरड ग्रामस्थ करतात. कारवाईची जबाबदारी ज्यांच्याकडे ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभाग व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)