शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पावसाचे पाणी वाहते करा, किटकजन्य आजार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:54 IST

सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. घरातील रिकामी भांडी, टायर यात पावसाचे पाणी साचत असून याच पाण्यात डासांची उत्पत्ती होते.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन : सावधान; दक्ष न राहिल्यास जडतील डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर, चंडीपूरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. घरातील रिकामी भांडी, टायर यात पावसाचे पाणी साचत असून याच पाण्यात डासांची उत्पत्ती होते. हे डास हिवताप, डेग्यू, मेंदुज्वर, चंडीपूरा आदी विविध आजारांचे मुळ असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या परिसरातील नाल्या वाहत्या करणे व ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.घराच्या छतावरील रिकाम्या भांड्यात तसेच घराच्या आवारात कुठेही पावसाचे पाणी साचल्यास त्या पाण्यात डास अळी मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. त्यामुळे डासाची घनताही वाढते. डासांच्या वाढलेल्या घनतेमुळे किटकजन्य आजार जसे हिवताप डेंग्यू, चिकुणगुणीया, मेंदुज्वर, चंडीपूरा आजाराचा प्रादूर्भाव वाढू शकतो. यामुळे मनुष्यावर प्रमाणात विपरीत प्रभाव होऊ शकतो. किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यासह आरोग्य विभागाने केले.दक्षता घेण्याकरिता सांगण्यात आलेले उपायसर्व गावामध्ये नाल्याचे पाणी वाहते राहील अशापद्धतीने बांधणी करणे.नाल्या नेहमी वाहत्या करणे व लघुयांत्रिकी पद्धत राबविणे.शाळेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात रॉकेल व आॅईल टाकावे.बांधकामावरील मजूराला ताप आल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन रक्त नमूणे तपासणी करणे.दूषित रूग्णाला समूळ उपचार देणे. तसेच सर्व स्थलांतरीत मजूरांची भ्रमणध्वनी क्रमांक सह नोंद ठेवणे.फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करणे.तलाव जलशिवारात इतर वनस्पती वाढू न देणे तसेच त्यात डास अळी भक्षक गप्पीमासे सोडणे.परिसरात जमा असलेले इलेट्रॉनिक्स कचºयाचे ढिगारे रचलेले टायर्स यावर पावसाळ्याच्या दिवसात प्लास्टिक झाकणे आवर्जुन लावणे.शेणाचे ढिगारे गावाच्या बाहेर ठेवावे तसेच लहान मुलांना जमिनीवर व भिंतीशी झोपवू नये.