शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पावसाच्या दडीने दुबारचे सावट

By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST

यंदा समाधानकारक पाऊस येणार हे भाकित लक्षात घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली;

शेतकरी चिंतातूर : कर्ज घेत करावी लागणार पुन्हा पेरणी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/सेवाग्राम : यंदा समाधानकारक पाऊस येणार हे भाकित लक्षात घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काहींनी अद्याप पेरण्या केल्या नाही. सदर शेतकऱ्यांना विलंबाने पेरणीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने दडी मारली आणि उन्ह तापत आहे. यामुळे पिके धोक्यात आली असून बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले. आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसावर कपाशी, तुरीची लावण व ज्वारी, सोयाबीनची पेरणी केली. पिके ओलव्यामुळे जमिनीच्या वर आलीत; पण पावसाने दडी मारली. सूर्य तळपू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या पिके चांगली असून बहुतांश शेतकऱ्यांची डवरणीही सुरू झाली आहे; पण काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने अंकूर कोमेजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून डवरणी झाल्याने शेतात वाळण येत आहे. यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. डोब आल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व तुरीची लावण केली; पण नंतर पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस या आठवड्यात झाला नाही तर संपूर्ण शेतीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. शासनाची घोषणा आणि बँकांचे असहकार्य शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर टाकणारे ठरत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वरुण देवाची आळवणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कर्जासाठी वणवण शासनाचा कर्जमाफीचा निर्णय शनिवारी झाला. असे असले तरी अद्याप बँकांना आदेश नाहीत. शिवाय १० हजार रुपयांच्या कर्जाबाबतही निर्देश नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सावकारांचे उंबरठे झिजवित कर्ज मिळवावे लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते.