शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीने दुबारचे सावट

By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST

यंदा समाधानकारक पाऊस येणार हे भाकित लक्षात घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली;

शेतकरी चिंतातूर : कर्ज घेत करावी लागणार पुन्हा पेरणी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/सेवाग्राम : यंदा समाधानकारक पाऊस येणार हे भाकित लक्षात घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काहींनी अद्याप पेरण्या केल्या नाही. सदर शेतकऱ्यांना विलंबाने पेरणीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने दडी मारली आणि उन्ह तापत आहे. यामुळे पिके धोक्यात आली असून बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले. आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसावर कपाशी, तुरीची लावण व ज्वारी, सोयाबीनची पेरणी केली. पिके ओलव्यामुळे जमिनीच्या वर आलीत; पण पावसाने दडी मारली. सूर्य तळपू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या पिके चांगली असून बहुतांश शेतकऱ्यांची डवरणीही सुरू झाली आहे; पण काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने अंकूर कोमेजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून डवरणी झाल्याने शेतात वाळण येत आहे. यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. डोब आल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व तुरीची लावण केली; पण नंतर पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस या आठवड्यात झाला नाही तर संपूर्ण शेतीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. शासनाची घोषणा आणि बँकांचे असहकार्य शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर टाकणारे ठरत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वरुण देवाची आळवणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कर्जासाठी वणवण शासनाचा कर्जमाफीचा निर्णय शनिवारी झाला. असे असले तरी अद्याप बँकांना आदेश नाहीत. शिवाय १० हजार रुपयांच्या कर्जाबाबतही निर्देश नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सावकारांचे उंबरठे झिजवित कर्ज मिळवावे लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते.