शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांसाठी पूल ठरतोय धोक्याचा

By admin | Updated: July 6, 2016 02:31 IST

धाम नदीचे बारमाही प्रवाही पात्र आणि विनोबा आश्रम यामुळे पवनारला नैसर्गिक आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

डागडुजीचा पत्ताच नाही : पर्यटक व्यक्त करतात संतापवर्धा : धाम नदीचे बारमाही प्रवाही पात्र आणि विनोबा आश्रम यामुळे पवनारला नैसर्गिक आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. त्यामुळेच पवनारला पर्यटनस्थळाचा क दर्जाही देण्यात आला आहे. पण या स्थळावर जाण्यासाठी पवनार येथील धाम नदीपात्रावर असलेला जुना पूल पर्यटकांसाठी अतिशय धोक्याचा ठरत आहे. पुलावरील मोठमोठे खड्डे आणि कठड्यांचा अभाव यामुळे शासनाची उदासीनताही प्रत्ययास येत आहे. पवनार येथील विनोबा आश्रमला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आलेले पर्यटक केवळ आश्रमलाच भेट देत नाही तर धामचे खळाळते पात्रही त्यांना भुरळ घालत असते. येथे जाण्यासाठी धाम नदीवरील लहान पुलाचा मुख्यत्वे उपयोग केला जातो. पण या काही वर्षात नवीन पुलामुळे जुन्या पुलाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील लोखंडी कठडे कायमचे नामशेष झाले आहे. विशेष म्हणजे या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून ते धोक्याचे ठरत आहे.सदर खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालक सरळ नदीत पडण्याचा धोका आहे. अश्या घटना अनेकवार घडल्याही आहेत. मोठ्या पुलावरही खड्ड्यांची मालिका आणि सातत्याने होत असलेली जड वाहतूक यामुळे पर्यटक लहान पुलावरूनच जाणे पसंत करतात. मोठ्या पुलावरून वळसा घालून येण्यापेक्षा लहान पूल सोयीचा असल्यानेही पर्यटक लहान पुलालाच पसंती देतात. पण त्यावर पडलेले भलेमोठे भगदाड अपघातास कारण ठरत आहेत. पर्यटनाचा क दर्जा असतानाही आणि आश्रम परिसरात जाण्यासाठी लहान पुलाचा जास्त उपयोग होत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी पर्यटकांसह गावातील नागरिक आश्चर्य आणि संताप व्यक्त करीत असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)