शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे दिव्यांगांची फटफजिती

By admin | Updated: July 9, 2017 00:33 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात शासनातर्फे दिव्यांग तपासणी व स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कारंजा येथील शासकीय दिव्यांग तपासणी व स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क कांरजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात शासनातर्फे दिव्यांग तपासणी व स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नियोजनाच्या अभावामुळे शनिवारी येथे आलेल्या अपंगांची फटफजिती झाली. या नियोजनशून्यतेमुळे अनेक दिव्यांगानी शिबिराचा लाभ न घेता घराची वाट धरली. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाला अनेक योजना राबवयाच्या आहेत. योजनांसाठी लाभार्थी निवडणे सोपे जावे म्हणून प्रत्येक दिव्यांगाची फेर तपासणी करून अपंगत्त्वाचे प्रमाण ठरविणे आणि त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे आधार कार्ड, प्राप्त करून घेत स्मार्ट कार्ड नोंदणी करणे हा या शिबिर आयोजनाचा उद्देश होता. दिव्यांगाचे प्रमाण ठरविण्यासाठी तज्ज्ञ चमू आलेली होती; पण कोणत्या प्रकारच्या अपंगांनी तपासणीसाठी व कागदपत्रे देण्यासाठी कोणत्या काउंटरवर जावे याबाबतचे कुठलेही नियोजन नव्हते. शिबिराचा लाभ घेण्याकरिता जवळपास ६०० अपगांनी धाव घेतली. रुग्णालयात तोबा गर्दी झाली होती. अनेक अंध व अपंग, कर्णबधीर इकडून-तिकडे धावत होते; पण त्यांना काय करावे, हे सूचन नव्हते. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले नव्हते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती मंडप नसल्यामुळे उन्हात केविलवाण्या अवस्थेत बसलेली दिसून आली. अनेक दिव्यांगांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले की, आम्हाला या शिबिराबद्दलची सूचना अगदी वेळेवर देण्यात आली. केवळ एकाच दिवशीचे शिबिर असल्यामुळे आम्हाला आजच कसेबसे यावे लागले. शिबिराला आलो नाही तर शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, म्हणून सर्वांनी आज गर्दी केली. ४० टक्के पेक्षा कमी अपंग असणाऱ्याला स्मार्ट कार्ड मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले. वेगवेगळ्या दिव्यांगाच्या तपासणीसाठी पुरेशा जागेत वेगवेगळे तपासणी काऊंटर लावायला पाहिजे होते. पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था अपुरी होती. त्यामुळे कूपण व अल्पोपहार मिळवितानाही अक्षरश: झुंबड उडाली. किमान दिव्यांगांच्या शिबिराचे तरी शासनाने काटेकोरपणे नियोजन करावे, वेळेचे बंधन पाळावे, अपंगांची फटफजिती करू नये, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षा येथे आलेल्या शिबिरार्थ्यांनी व्यक्त केली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही गरजेची झाली आहे.