शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

निधी नसल्याने पुलाची दुरूस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:42 IST

वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती.

ठळक मुद्देगोजी-येरणगाव रस्त्यावर पूल खचला : अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी पूल दुरूस्तीसाठी हेड नाही आणि असे सांगून आम्ही या पूलाच्या दुरूस्तीचे काम करू शकणार नाही असे सांगितले. त्यांनी जिल्हा नियोजन व विकास अधिका ऱ्यांकडे निधीची व्यवस्था आहे. ते हे काम करू शकतात अशी माहिती उज्वला देशमुख यांना दिली. ज्या रस्त्यांवरून शेकडो गावातील नागरिकांची रहदारी आहे. अशा रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम निधीची तरतूद करू शकत नसेल तर या ठिकाणी भविष्यात होणाºया अपघाताची जबाबदारी कुणाची असा सवाल देशमुख यांनी केला आहे. पुलाच्या दुरूस्तीसाठी जर निधी उपलब्ध होत नसेल तर अशा व्यवस्था काय कामाच्या असा प्रश्न उज्जवला देशमुख यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद सदस्यांना अशा कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आता आली आहे. येरणगाव गोजी परिसरात नागरिकांना रहदारी बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असेही त्यांनी म्हटले आहे.कात्री चौरस्ता रस्त्याची दैनाकात्री ते कात्री चौरस्ता रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन डबके तयार झाले आहे. येथून वाहन चालवितांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. कात्री येथील रस्त्याचे काम मागील एक दशकापूर्वी करण्यात आले होते. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्याला अल्पावधीच खड्डे पडले. रस्त्यावरून चारचाकी वाहने तर सोडा परंतू दोनचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निंद्रावस्थेत आहे. भाजप पदाधिका ऱ्यांनी या रस्त्याच्या दुरस्ती कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याच्याविषयी कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता दुरस्त करावा अशी मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा