शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

अधिकारीच नसल्याने बँकेत खातेदारांची बोळवण

By admin | Updated: August 22, 2016 00:32 IST

अधिकारी चांगला असला की, नागरिक, ग्राहकांची कामे सोईस्करपणे होतात; पण अधिकारीच नसले तर कामांचा खोळंबा होतो.

दलालांचा सुळसुळाट : खाते उघडण्यासाठीही लागतात २० दिवसझडशी : अधिकारी चांगला असला की, नागरिक, ग्राहकांची कामे सोईस्करपणे होतात; पण अधिकारीच नसले तर कामांचा खोळंबा होतो. सध्या असाच प्रकार येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये घडत आहे. शाखा व्यवस्थापकांची बदली झाली व नवीन अधिकारी देण्यात आला नाही. यामुळे कामे ठप्प झाली असून खातेदारांची बोळवण केली जात असल्याचे दिसते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.झडसी व परिसरातील ४० ते ५० गावांचा व्यावहारिक संपर्क सेट्रल बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेशी येतो. पीक कर्ज व इतर कामांसाठी शेकडो ग्राहक स्थानिक बँकेत येतात. बँकेचा व्यवहार वाढावा. कामात सुसज्जता यावी म्हणून बदली होऊन गेलेल्या शाखा प्रबंधकांनी दोन वर्षे अथक प्रयत्न केले. यातून बँक कर्मचाऱ्यांची क्रियाशीलता वाढविली. ग्राहकांना अडचणी येऊ नये म्हणून शासनाने नवीन मोठी इमारत बँकेसाइी भाडे तत्वावर घेतली. यामुळे दलालांना आळा घालण्यास शाखा प्रबंधकाला यश आले होते; पण आता सेंट्रल बँकेच्या शाखेत अधिकाऱ्यांची गळती सुरू झाली आहे. दुसरा अधिकारी येत नसल्याने बँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. साधे खाते काढायचे असले तरी ग्राहकांना १५ ते २० दिवस लागत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून ग्राहकांची बोळवण केली जाते. शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहे. यामुळे शेतकरी आर्थिक व्यवहारासाठी बँकेत येतात. या शेतकऱ्यांना लगेच दलाल हेरून घेतात. आपली कामे त्वरित करून देतो, असे म्हणत पैसे उकळतात. हा प्रकार पुन्हा वाढीस लागल्याने शेतकरी त्रस्त आहे.शाखा व्यवस्थापकाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलाही व्यवहार १५ ते २० मिनिटांत संपत होता. आता त्याला १५ ते २० दिवस लागतात. यामुळे ग्राहक आश्चर्य व्यक्त करतात. या प्रकारांमुळे दलालांचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. यात अधिकारी, कर्मचारी तर सामील नाही ना, असा संशय ग्राहक उपस्थित करतात. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)